प्रभा गणोरकर
Jump to navigation
Jump to search
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल. |
प्रा.डॉ. प्रभा रामचंद्र गणोरकर (८ जानेवारी, इ.स. १९४५ - ) या एक मराठी लेखिका, कवयित्री व साहित्यसमीक्षक आहेत. मूळच्या अमरावतीच्या असणाऱ्या गणोरकरांनी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात, मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात, त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे.
शाळा-महाविद्यालयातील कविता लेखन[संपादन]
गणोरकरांनी शाळेपासूनच कविता रचायला सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या लहान भावाला श्रीकृष्णाचा मृत्यू आणि द्वारका बुडणे ही महाभारतातली गोष्ट सांगितल्यावर द्वारका ही कविता लिहून काढली. ही त्यांची आवडती कविता आहे.
अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच गणोरकरांनी इंदिरा संत, करंदीकर, केशवसुत, गोविंदाग्रज, पाडगावकर, बापट, बालकवी, बोरकर, मर्ढेकर आदी कवींचे काव्यसंग्रह अभ्यासले. असे असले तरी गणोरकरांवर त्यांच्यावर बोरकर आणि इंदिरा संत यांचाच प्रभाव आहे.
डॉ. प्रभा गणोरकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]
- आशा बगे यांच्या निवडक कथा (संपादित)
- एकेकीची कथा (संपादित, मूळ लेखक - गंगाधर गाडगीळ)
- कादंबरी : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
- किनारे मनांचे (१९९८)
- गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी (१९९७)
- निबंध : एक साहित्यप्रकार (विद्यापीठीय अभ्यासक्रमातले पुस्तक)
- बा.भ. बोरकर (साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्याचे निर्माते या मालिकेतले पुस्तक, १९९६)
- बोरकरांची निवडक कविता (संपादित, १९९०)
- मराठीतील स्त्रियांच्या कविता (संपादित, २०१६)
- वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश
- विवर्त (कवितासंग्रह, १९८५)
- व्यतीत (कवितासंग्रह, १९७४)
- व्यामोह (कवितासंग्रह)
- शांता शेळके यांची निवडक कविता (संपादित)
- संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (सहसंपादित, १९९८)
सन्मान आणि पुरस्कार[संपादन]
- ’व्यामोह’ या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारचा कवी केशवसुत पुरस्कार (इ.स. २०१६)
- दामोदर अच्युत कारे पुरस्कार
- ५व्या समरसता साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद (बहुधा इ.स. २००२)
- पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे काव्ययोगिनी पुरस्कार
- प्रभा गणोरकर या सासवड येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्या वेळी त्या निवडणुकीत पराभूत होऊन फ.मुं. शिंदे निवडले गेले.
- बहिणाबाई पुरस्कार
- भास्कर लक्ष्मण भोळे पुरस्कार
- ‘मराठीतील स्त्रियांच्या कविता’ या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कृष्ण मुकुंद पुरस्कार (१-६-२०१६)
- महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे भा.रा. तांबे पुरस्कार
- धामणगाव येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनाच्चे अध्यक्षपद (इ.स. २०००)
- शांता शेळके साहित्य पुरस्कार (२०१२)