प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रधानमंत्री उज्वला योजना या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (इं:Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही भारत सरकारद्वारा सन २०१६मध्ये विमोचित केल्या गेलेली एक योजना आहे.


प्रधानमंत्री उज्वला योजनेचे उद्देश: या योजनेद्वारे भाररातील दारिद्ऱ्य रेषेखाली असणाऱ्या सुमारे ५ कोटी महिलांना घरघुती एलपीजी गॅस जोडण्या देण्यात येणार आहेत.

योजनेचे उद्देश[संपादन]

  • महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे.
  • स्वयंपाक करतांना लाकडी जळण वापरण्यामूळे होणारे दुष्परिणाम कमी करणे.
  • स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे भारतात होणारे मृत्यू कमी करणे.
  • घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छ्वासाच्या तक्रारी दूर करणे
  • पर्यावरण संरक्षण

तपशील[संपादन]

"प्रधानमंत्री उज्ज्वला योजना" ही एक भारत सरकारची, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सन २०१६ मध्ये विमोचित केली गेलेली कल्याणकारी योजना आहे.[१][२]

यात, २१ जुलै २०१६ च्या आकडेवारीनुसार लाभार्थ्यांना सुमारे १७,६६,२५४ जोडण्या दिल्या गेल्या..[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ टाईम्स ऑफ इंडिया: "उज्वला योजनेत दारिद्ऱ्य रेषेखालील कुटुंबाना रु.९९० मध्ये एलपीजी शेगडी मिळणार" Check |दुवा= value (सहाय्य). टाईम्स ऑफ इंडिया.
  2. ^ इंडियन एक्सप्रेस: "प्रधानमंत्री उज्वला योजना : 'यूपीए सरकारने वंचितांना अदत्त ठेवले, ज्याद्वारे आम्हास त्रास होत आहे'" Check |दुवा= value (सहाय्य). इंडियन एक्सप्रेस.
  3. ^ "ओरिसाडायरी.कॉम हे संकेतस्थळ". Archived from the original on 2016-08-18. 2016-10-12 रोजी पाहिले.