दूरियां (१९७९ चित्रपट)
Appearance
दूरियां (१९७९ चित्रपट)
| प्रकाशन तारीख | 1979, 1977 |
|---|---|
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी भाषा |
| दिग्दर्शक | Bhimsain |
| पटकथा | शंकर शेष |
| संगीतकार | जयदेव (संगीतकार) |
दूरियां हा १९७९ चा बॉलिवूड चित्रपट आहे जो भीमसेन खुराणा दिग्दर्शित आणि शंकर शेष यांनी लिहिलेला आहे. चित्रपटात उत्तम कुमार आणि शर्मिला टागोर यांनी मुख्य भूमिका केल्या आहे आणि सोबत श्रीराम लागू, जलाल आगा, सुधा चोप्रा, सुलभा देशपांडे हे कलाकार आहे.[१] शंकर शेष यांना कथेसाठी फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार मिळाला.
कैलाश (उत्तम कुमार) आणि रत्ना (शर्मिला टागोर) हे एक विवाहित जोडपे एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांना एक मूल आहे. तथापि, त्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षांमूले त्यांना वेगळे व्हायची परिस्थीती येते.
संगीत
[संपादन]चित्रपटाचे संगीत जयदेव यांनी दिले होते.
- "जिंदगी मे जब तुम्हारे गम नहीं थे" - भूपिंदर सिंग, अनुराधा पौडवाल
- "जिंदगी जिंदगी मेरे घर आना" - भूपिंदर सिंग, अनुराधा पौडवाल
- "इव्हनींग न्यूज, बीस बीस पैसा निकलो भाई" - मन्ना डे
- "खोटा पैसा नहीं चलेगा नहीं चला है नही चलेगा" - के. एन. शर्मा, राणू मुखर्जी, प्रीती सागर
संदर्भ
[संपादन]- ↑ "Dooriyan (1979) - Friday Review". द हिंदू. ८ मे २०१४.