डहाणू औष्णिक विद्युत केंद्र
डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधील एक कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे. [१] या प्रकल्पाचे बांधकाम बीएसईएस लिमिटेड यांनी केले आणि नंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बीएसईएसच्या स्वाधीन केले. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटी हा प्रकल्प चालवीत आहे. प्रकल्प मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर असून, मुंबईपासून १२० किमी अंतरावर आहे आणि मुंबई-अहमदाबाद-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग ८ (भारत)पासून २० किमी अंतरावर आहे.
क्षमता[संपादन]
डहाणू औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता ५०० मेगावॅट (२x२५० मेगावॅट) आहे. १९९५मध्ये हे विद्युत केंद्र सुरू झाले आणि १९९६पासून व्यावसायिकपणे वीज निर्मिती केली जात आहे. [२]
युनिट क्रमांक | क्षमता | आरंभण तारीख | स्थिती |
---|---|---|---|
१ | २५० मेगावॅट | १९९५ जानेवारी | सक्रिय |
२ | २५० मेगावॅट | १९९५ मार्च | सक्रिय |
संदर्भ[संपादन]
- ^ मटा वृत्त सेवा (MaTa Vrutt Seva) (October 2010). "डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार" [Dahanu Oaushnik Urja Prakalpala Rajiv Gandhi Paryavaran Puraskar]. Maharashtra Times (Marathi भाषेत). Palghar District, Maharashtra, India. 1 April 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "RInfra". 20 April 2015 रोजी पाहिले.