डहाणू औष्णिक विद्युत केंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डहाणू औष्णिक विद्युत केंद्र

डहाणू औष्णिक विद्युत केंद्र हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातल्या डहाणू मधील एक कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे. [१] या प्रकल्पाचे बांधकाम बीएसईएस लिमिटेड यांनी केले आणि नंतर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने बीएसईएसच्या स्वाधीन केले. सध्या अदानी इलेक्ट्रिसिटी हा प्रकल्प चालवीत आहे. प्रकल्प मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर असून, मुंबईपासून १२० किमी अंतरावर आहे आणि मुंबई-अहमदाबाद-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग ८ (भारत)पासून २० किमी अंतरावर आहे.

क्षमता[संपादन]

डहाणू औष्णिक विद्युत केंद्राची स्थापित क्षमता ५०० मेगावॅट (२x२५० मेगावॅट) आहे. १९९५मध्ये हे विद्युत केंद्र सुरू झाले आणि १९९६पासून व्यावसायिकपणे वीज निर्मिती केली जात आहे. [२]

युनिट क्रमांक क्षमता आरंभण तारीख स्थिती
२५० मेगावॅट १९९५ जानेवारी सक्रिय
२५० मेगावॅट १९९५ मार्च सक्रिय

संदर्भ[संपादन]

  1. ^ मटा वृत्त सेवा (MaTa Vrutt Seva) (October 2010). "डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला राजीव गांधी पर्यावरण पुरस्कार" [Dahanu Oaushnik Urja Prakalpala Rajiv Gandhi Paryavaran Puraskar]. Maharashtra Times (Marathi भाषेत). Palghar District, Maharashtra, India. 1 April 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "RInfra". 20 April 2015 रोजी पाहिले.