उत्तर कांड
seventh book of the Ramayana | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | साहित्यिक कार्य | ||
|---|---|---|---|
| ह्याचा भाग | रामायण | ||
| |||
उत्तर कांड हा हिंदू धर्मग्रंथ रामायण मधील शेवटचा सातवा भाग आहे. वाल्मिकी यांनी रचलेल्या ह्या महाकाव्याचे सात भाग आहेत.

काही शास्त्रज्ञ लक्षात आणून देतात की उत्तर कांड आणि रामायणाच्या इतर पुस्तकांमध्ये भाषिक आणि वक्तृत्वात्मक फरक आहेत, विशेषतः सीतेचा वनवास आणि शकुंभुकाच्या मृत्यूसारख्या कथा. बाल कांडासह काही शास्त्रज्ञ ह्या भागास अंतर्भाव मानतात, आणि असेही म्हटले जाते की मूळ काव्य हे युद्ध कांडात संपले आहे.[१]
सारांश
[संपादन]वनवासाचा कालावधी संपल्यानंतर, राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान अयोध्येला परतले, जिथे रामाचा राज्याभिषेक केला जातो. रामाची भक्ती सिद्ध करण्यास सांगितल्यावर, हनुमानाने आपली छाती फाडली आणि सर्वांना आश्चर्य वाटले की, त्याच्या छातीत राम आणि सीतेची प्रतिमा आहे. राम अयोध्येवर राज्य करतात आणि राजवटीला राम-राज्य म्हटले गेले; असे ठिकाण जिथे सामान्य लोक आनंदी आणि समाधानी असतात. सीतेची अग्नीपरीक्षा झाली; पण तरीही काही नगरवासीयांच्या संशयास्पद बोलण्याने ती वनवासात निघून गेली. वाल्मिकी आश्रमात लव आणि कुश यांचा जन्म झाला व त्यांनी तेथे प्रशिक्षण घेतले. रामाने अश्वमेध यज्ञ केले व रामाची भेट लव-कुश व सीता यांच्याशी झाली. ह्यात रामाच्या शेवटच्या दिवसांचे वर्णन आहे व रामानंतर लव-कुश सिंहासनावर बसले.
संदर्भ
[संपादन]- ^ SHARMA, SESHENDRA. "Valmiki Ramayana Balkanda". stotranidhi.com.
