Jump to content

अयास्य (ऋषी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अयास्य - ऋग्वेदामध्ये (१०-१०८-८) अयास्य ऋषींचा उल्लेख येतो.

सत्यामधून उत्पन्न झालेला सप्तमुख विचार अयास्य यांना प्राप्त झाला आहे आणि ते इंद्र-स्तुतीपर मंत्रांचे गायन करतात अशी त्यांच्याविषयी माहिती मिळते. यांना आठवा किंवा दहावा अंगिरस म्हणता येईल असे श्रीअरविंद म्हणतात. (वेद-रहस्य: पान १५६) [] सप्तमुख विचार त्यांना प्राप्त झाल्याने ते 'विश्वजनय' झाले. म्हणजे सर्व लोकांमध्ये संचार करण्याची सिद्धी त्यांना प्राप्त झाली. पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग यांच्या पलीकडचा स्वर्लोकही त्यांना ज्ञात झाला होता.(वेद-रहस्य: पान १५८)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ वेद-रहस्य - मूळ लेखक योगी श्रीअरविंद, अनुवाद - स्वर्णलता भिशीकर, २०२३, श्रीअरविंद आश्रम