विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
हा ऐतिहासिक विषयाशी संदर्भातील लेख असून,विकिपीडियावरील लेखन विश्वकोशिय आणि मराठी विकिपीडिया लेखनाचे मानदंडास अनुसरून असणे अभिप्रेत आहे.*कथाकथन अथवा ललित साहित्य लेखनशैली टाळावी,ऐतिहासिक कथा कादंबर्यातील संदर्भ टाळावेत अथवा विशीष्टपणे नमुद करून ललित साहित्यातील उल्लेखांबद्दल वेगळा परिच्छेद बनवावा. *विकिपीडियावर इतिहास-विषयक संदर्भ देताना इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधनांचा उपयोग करून केलेल्या समसमिक्षीत संशोधनाचेच संदर्भांना प्राधान्य देण्याबद्दल सजग रहावे.
ऐतिहासिक परिपेक्षात एकाच (कुटूंबा/घराण्या)तील दोन पिढ्यात एकाच नावाच्या व्यक्ती असु शकतात.कृ.[[अंतर्गत विकिदुवा]] देताना, तो नेमका कोणत्या लेखात उघडतो ते तपासा;घाई आणि गल्लत टाळा.
ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने.
ऐतिहासिक कलाकॄती - समसमीक्षित (पीअर-रिव्ह्यूड) किंवा संपादित माध्यमांतून प्रकाशित झालेली चित्रे/फोटो; मात्र खास त्यांच्यासाठी आयोजलेल्या प्रदर्शनांतून प्रसिद्ध झालेली नसावीत.
एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठेपुरते मर्यादित होते. त्यावेळी ते कसबे पुणे या नावाने ओळखले जाई. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्याचा विस्तार झाला. आदिलशाही मध्ये कसबे पुणे हे दुर्लक्षित गाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजीचे वडील शहाजी भोसले यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली.१६४२ला आई जिजाबाई या बाल शिवाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवाजीचे महाराजांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले. कसबा पेठेचे रूप पालटण्यास दादोजी कोडदेव यांचा सक्रिय सहभाग होता.