बाळापूर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Balapur Fort (en); बाळापूर किल्ला (mr); బాలపూర్ కోట (te); பாலாபூர் கோட்டை (ta) fort in Akola district, Maharashtra (en); fort in Akola district, Maharashtra (en); மகாராட்டிர மாநிலக் கோட்டை (ta) बाळापुर किल्ला, औंढा (mr)
बाळापूर किल्ला 
fort in Akola district, Maharashtra
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारfortress
स्थान बाळापुर, अकोला जिल्हा, अमरावती विभाग, महाराष्ट्र, भारत
द्वारे चालन केले
  • Azam Shah
चालक कंपनी
वारसा अभिधान
  • Monument of National Importance
स्थापना
  • इ.स. १७२१
Map२०° ४०′ १२.९२″ N, ७६° ४६′ २५.३१″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

बाळापूर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर वसलेले बाळापूर हे जळगाव ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते बुलढाणा तसेच वाशीम या जिल्ह्यांच्या ठिकाणांना गाडीमार्गाने जोडलेले आहे.


इतिहास[संपादन]

सुभेदार मल्हारराव होळकर बढवाणीचा शासक मोहन सिंग यांच्या वतीने बाळापुरच्या लढाईत उतरले. त्यांचा पराक्रम पाहुन पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी स्वराज्यात ५०० अश्वाचे मनसबदार केले.

छायाचित्रे[संपादन]

वर्णन[संपादन]

मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे. बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीला जागोजाग बलदंड बुरूज बांधून संरक्षणाची पुरेशी सिद्धता केली आहे.

बाळापूर किल्ल्याचा प्रवेशमार्ग उत्तरेकडून आहे. या प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा चौरस अशा भक्कम बुरुजामध्ये आहे. या उत्तराभिमुख दरवाजातून आत गेल्यावर दुसरा दरवाजा असून तो पश्चिमेकडे तोंड करून आहे. हे लाकडी दरवाजे अजूनही पहायला मिळतात. दारावरच्या कमानीवर महिरप आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूला तटबंदी असून समोर उत्तराभिमुख असा तिसरा दरवाजा आहे. यालाही महिरप केलेली आहे.

या तिसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होतो. आतल्या इमारती जुन्या असून त्यांची जुजबी दुरुस्ती करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालये केलेली आहेत.

तटबंदीवर चढण्यासाठी जागोजागी पायऱ्या केलेल्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून प्रशस्त रुंदीच्या तटावर पोहोचता येते. तटावरून किल्ल्याला फेरी मारता येते. या तटबंदीवरून बाहेरील तटबंदीचेही दर्शन होते. बलदंड बुरुजांनी वेढलेली तटबंदी किल्ल्याच्या बेलागपणाची जाणीव करून देते.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

गडावरील ठिकाणे[संपादन]

बाळापूर गावाच्या दक्षिणेकडे नदीकाठावर मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री आहे. बाळापूरच्या किल्ल्याच्या भ्रमंतीमध्ये ही छत्रीही आवर्जून पहावी अशीच आहे.

मुख्य जागा[संपादन]

आजूबाजूच्या सपाट प्रदेशामुळे तसेच लहानश्या उंचवट्यावर बांधलेल्या किल्ल्यामुळे दूरपर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाते. पावसाळ्यात किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी नद्यांच्या पाण्याचा विळखा पडतो. २००० साली नद्यांना आलेल्या महापुरात तटबंदीचा काही भाग ढासळला आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक[संपादन]

या किल्ल्याला २९ ऑगस्ट, इ.स. १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१]

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "नोटिफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्युमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). Archived from the original (PDF) on 2016-03-04. २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)