शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू
पश्चिम द्रुतगती महामार्ग | |
---|---|
प्रस्तवित प्रकल्पाचा नकाशा | |
प्रकल्पाचे कल्पित चित्र | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | २२ किलोमीटर (१४ मैल) |
सुरुवात | शिवडी, मुंबई |
शेवट | जवाहरलाल नेहरू बंदर |
स्थान | |
शहरे | मुंबई, नवी मुंबई |
जिल्हे | मुंबई जिल्हा, रायगड जिल्हा |
राज्ये | महाराष्ट्र |
मुंबई पारबंदर प्रकल्प (Mumbai Trans Harbour Link) किंवा शिवडी-न्हावा शेवा पारबंदर मार्ग हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रस्तावित प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाईल. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाईल ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ होईल. तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येईल.
मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम १९६३ साली रचली गेली. महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीस फारसे स्वारस्य न दाखवल्यामुळे व राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प बासनातच राहिला. २०१२ साली केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली. परंतु ह्या पूलामुळे येथील नैसर्गिक खारफुटी नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. तसेच सध्या कोणत्याही प्रमुख खाजगी कंपनीने ह्या प्रकल्पामध्ये रस दाखवला नाही. ह्या कारणांस्तव ₹ ११,००० कोटी खर्च अपेक्षित असलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे भविष्य अज्ञात आहे.
बाह्य दुवे[संपादन]
- एम.एम.आर.डी.ए.च्या संकेतस्थळावरील माहिती Archived 2021-01-10 at the Wayback Machine.