सत्यपालसिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सत्य पाल सिंग बाघेल या पानावरून पुनर्निर्देशित)
सत्य पाल सिंग बाघेल

विद्यमान
पदग्रहण
२६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील अजित सिंग
मतदारसंघ बागपत

जन्म २९ नोव्हेंबर, १९५५ (1955-11-29) (वय: ६८)
बसौली, उत्तर प्रदेश, भारत
राजकीय पक्ष भाजप
पत्नी अलका सिंग
अपत्ये

डॉ. सत्यपालसिंह (२९ नोव्हेंबर, १९५५:बसौली, मीरत जिल्हा, उत्तरप्रदेश - ) हे मुंबईचे माजी पोलीस कमिशनर असून उत्तर प्रदेशातील बागपत येथून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार आहेत. त्यांचा २ सप्टेंबर २०१७ रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान असलेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांना मनुष्यबळ विकास हे खाते मिळाले आहे. हे २०१७ त२ २०१९ पर्यंत भारताचे मनुष्यबळ राज्यमंत्री होते.

शिक्षण[संपादन]

सत्यपालसिंह हे रसायनशास्त्रातील एम.एस्‌सी. असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.फिल. केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून एम.बी.ए. ही पदवी घेतली. नागपूर विद्यापीठातून ते लोकप्रशासन या विषयात एम.ए. झाले असून नक्षलवाद या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी त्या विद्यापीठाची पीएच.डी. मिळवली आहे. ते आय.पी.एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) अधिकारी आहेत.

आजपर्यंतची पोलीस खात्यातील पदे[संपादन]

  • गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
  • नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
  • बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक
  • नागपूर पोलीस क्षेत्राचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस
  • मुंबईचे (गुन्हेगारी शाखेचे) पोलीस सहआयुक्त
  • महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्राचे विशेष इन्स्पेक्टर जनरल
  • नागपूरचे पोलॆस आयुक्त
  • पुण्याचे पोलीस आयुक्त
  • महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील कायदा, सुव्यवस्था आणि प्रशासन खात्याचे ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (ADGP)
  • मुंबईचे पोलीस आयुक्त

पोलीस खात्यातील कामगिरी[संपादन]

  • मुंबईत १९९० च्या आसपास विस्तारलेल्या गुन्हेगारी विश्वाची पाळेमुळे खणून काढली. या गुन्हेगारांत छॊटा राजन, छोटा षकील आणि अरुण गवळी यांसारखे गुंड होते.
  • १९९० च्या उत्तरार्धात त्यांनी लूटमार करणाऱ्या, खंडणी वसूलणाऱ्या आणि प्रस्थापितांचे खून करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचा फडशा पाडला. हे करण्यासाठी त्यांनी खास पोलीस गट तयार करून दया नायक, प्रदीप शर्मा आणि विजय साळसकर यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांना चकमकी घडवून गुंडांना ठार मारण्याची मोकळीक दिली.[ संदर्भ हवा ]
  • २५ ऑगस्ट २००३ रोजी मुंबईच्या जव्हेरी बाजाजारात आणि गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या बाँबस्फोटांतील गुन्हेगारांचा छडा लावला.