खोती पद्धत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खोती या पानावरून पुनर्निर्देशित)

खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत. खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे. तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे. खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार, वतनदार असाही होतो.


खोती पद्धतीमुळे कोकणातील शेतकरी पिढ्यांपिढ्या गांजले होते. कुळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती. ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. कोकणातील तत्कालीन शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली. त्यांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड,दापोली, तळा, रोहा, खेड इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या. त्यानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.[१] शेतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते. शेतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली. त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.

शेतकरयांच्या लढयामुळे त्यावेळी अनेक कुटुंबांची ससेहोलपट झाली असली तरी पुढच्या पिढीला या आंदोलनामुळे अच्छे दिन आले. चरी कोपरच्या लढ्यामुळे कसेल त्याची जमीन हे धोरण अमलात आले. कूळ कायदा तयार करण्यात आला. [२]

खोतांचे अधिकार[संपादन]

एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत. खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो. खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बाबासाहेब आणि शेतकरी". Lokmat. 14 एप्रि, 2016. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "तब्बल सात वर्ष चालला होता शेतकऱ्यांचा 'तो' संप!". 24taas.com. 1 जून, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)