कबीर पंथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संत कबीर

कबीर पंथ किंवा सतगुरू कबीर पंथ भारताच्या भक्तीकाळातील कवी संत कबीर यांच्या शिकवणींवर आधारित एक संप्रदाय आहे.[१] कबीरांचे शिष्य धर्मदास यांनी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे शंभर वर्षांनंतर या पंथाची सुरुवात केली होता. सुरुवातीला वैचारिक आणि नैतिक शिक्षणांवर आधारित हा पंथ कालांतराने धार्मिक संप्रदायात बदलला.[२] कबीर पंथाच्या अनुयायांमध्ये हिंदू, मुसलमान, बौद्ध आणि जैन अशा सर्व धर्मांचे लोक समाविष्ट आहेत.[३] कबीरांच्या रचनांचा संग्रह बीजक या ग्रंथाच्या वैचारिक आणि आध्यात्मिक विचारांचा आधार आहे.[४]

प्रमुख शाखा[संपादन]

भारतातील कबीर पंथाच्या मुख्यतः तीन शाखा मानल्या जातात. काशीची (कबीरचौरा) शाखा, धनौतीची भगताही शाखा आणि छत्तीसगडची शाखा. या शाखांचे संस्थापक अनुक्रमे: श्रृती गोपाल साहेब, भगवान गोसाई आणि मुक्तामनी नाम साहेब यांना मानले जाते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kāmat, Aśok Prabhākar (1971). Hindī aura Mahārāshṭra kā snehabandha (हिंदी भाषेत). Mahārāshṭra Rāshṭrabhāshā Sabhā.
  2. ^ Garg, Kavita (2009-01-01). Saint Kabir (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-8430-012-3.
  3. ^ Dissent, protest, and reform in Indian civilization.
  4. ^ Malik, Subhash Chandra (1977). Dissent, Protest, and Reform in Indian Civilization (इंग्रजी भाषेत). Indian Institute of Advanced Study.

बाह्य दुवे[संपादन]