सावरकर साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनेक सावरकरप्रेमी एकत्र येतात आणि एक सावरकर साहित्य संमेलन भरवतात. त्यामुळे भारतात आणि भारताच्या बाहेरही अनेक सावरकर साहित्य संमेलने होतात. अशी संमेलने भरवणारी मंडळे एकाहून अधिक असल्याने सावरकर संमेलनांची क्रमवारी लावता येत नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव असलेली ही काही साहित्य संमेलने --

  • शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने अंदमानमधील पोर्टब्लेअरमध्ये मार्च २०१०मध्ये शिवसंघाचे संस्थापक कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी सावरकर मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. अंदमानच्या इतिहासात सावरकरांच्या साहित्यावरचा हा पहिलाच कार्यक्रम ठरला.
  • शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने दुसरे सावरकर साहित्य संमेलन १० फेब्रुवारी २०१२ रोजी श्रीलंकेत भरले होते. अध्यक्ष निनाद बेडेकर होते.
  • सावरकर सेवा संस्था आणि सावरकर मित्र मंडळ यांनी भरवलेले १ले सावरकर विश्व संमेलन मॉरिशसमध्ये भरले होते.
  • सावरकर सेवा संस्थेने भरवलेले २रे सावरकरविश्व संमेलन दुबईमध्ये भरले होते.
  • काठमांडू (नेपाळ) मध्ये तिसरे सावरकर मराठी विश्‍व साहित्य संमेलन ११-२-२०१३ रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे होते.
  • तिसरे सावरकर विश्व संमेलन २०-४-२०१३ रोजी सावरकर सेवा संस्था, लंडनचे महाराष्ट्र मंडळ आणि औरंगाबाद येथील सावरकर प्रेमी मंडळ लंडनमध्ये भरवणार आहे.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यासमंडळ, मुंबईतर्फे २२ वे सावरकर साहित्य संमेलन २०-२१ फेब्रुवारी २०१० या काळात नागपुरात झाले. सावरकर साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्र.ल. गावडे हे संमेलनाध्यक्ष होते.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व गोव्याचे कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा मंडळ केपे (गोवा) यांनी आयोजित केलेले २३वे सावरकर साहित्य संमेलन २६-२७ फेब्रुवारी २०११ला झाले. संमेलनाचे अध्यक्ष मुंबईतील सव्यसाची पत्रकार अरविंद कुलकर्णी हे होते.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई आणि नवनिर्माण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २७ ते २९ जानेवारी २०१२ या दरम्यान लातुरात झाले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर अभ्यंकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • २५वे रौप्य महोत्सवी सावरकर साहित्य संमेलन १५ ते १७ मार्च २०१३ या काळात नाशिकला झाले. अध्यक्ष यशवंत पाठक होते.
  • २६वे संमेलन बडोदा येथे २४-२५-२६ जानेवारी २०१४ या कालावधीत होणार आहे. संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर असतील.
  • फेब्रुवारी २०१४ मध्ये २२ व २३ या दिनांकांना यवतमाळ येथे तेथील सावरकर विचार मंच या संस्थेतर्फे राजदत्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय सावरकर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
  • २७वे संमेलन हैदराबाद येथे १३-१४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत झाले होते. संमेलनाध्यक्ष भटके विमुक्त प्रतिष्ठान संचलित, यमगरवाडी प्रकल्पाचे संरक्षक गिरीश प्रभुणे होते.
  • २८वे सावरकर साहित्य संमेलन रत्‍नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१६ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष भिकू इदाते होते. हे संमेलन स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई) व स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या सहकार्याने आयोजित झाले होते.
  • २५ व २६ फेब्रुवारी २०१६ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे झाले. संमेलनाचे अध्यक्ष देशभक्त कोशाचे संपादक चंद्रकांत शहासने होते.
  • २९वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन २१ ते २३ एप्रिल २०१७ या काळात ठाणे शहरातील गडकरी रंगायतन येथे झाले. राजकीय आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक रमेश पतंगे हे संमेलनाध्यक्ष होते.
  • ३०वे सावरकर साहित्य संमेलन सांगलीत २०-२१-२२ एप्रिल २०१८ रोजी झाले. साहित्यिक दा.वा. नेने अध्यक्षपदी होते.
  • धुळे - महाराष्ट राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे २ फेब्रुवारी २०१९ रोजी एक अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन झाले. महाराष्ट राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर संमेलनाध्यक्ष होते.
  • ३१वे 'स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन सावरकर साहित्य अभ्यास मंडळाच्या वतीने कल्याण येथे १६ जून २०१९ रोजी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध लेखक, सावरकर अभ्यासक व व्याख्याते सच्चिदानंद शेवडे होते.
  • (हेही ३१वे?) स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाऊंडेशनतर्फे कल्याणच्या कॅ. र. मा. ओक विद्यालयात २२ डिसेंबर २०१९ रोजी 'अखिल भारतीय' सावरकर साहित्य संमेलन झाले.

सावरकर विश्वसाहित्य संमेलन[संपादन]

  • ५-६ सप्टेंबर २०१५ या काळात अंदमानमध्ये वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन झाले होते.
  • २०१७ साली ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये वीर सावरकर विश्व साहित्य संमेलन झाले होते.

हे सुद्धा पहा[संपादन]