शंकरराव चव्हाण
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रिय मंत्री होते. त्यांचा जन्म जुलै १४, १९२० रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. ते १९७५ ते १९७७ आणि १९८६ ते १९८८ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकीक होता. त्यांनी केंद्रात गृह, अर्थ यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. फेब्रुवारी २६, २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
| मागील: वसंतराव नाईक |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेब्रुवारी २१, १९७५ - मे १७, १९७७ |
पुढील: वसंतदादा पाटील |
| मागील: शिवाजीराव निलंगेकर |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मार्च १२, १९८६ - जून २६, १९८८ |
पुढील: शरद पवार |
|
|
|---|

