राहुल शरद द्रविड (जन्म जानेवारी ११, इ.स. १९७३, इंदूर, मध्य प्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला इ.स. १९९६ मध्ये सुरूवात केली. जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो.
विजेता पेंढारकर या नागपूर स्थित डॉक्टरशी विवाहबद्ध.

[संपादन] आंतरराष्ट्रीय कारकिर्द
राहुल द्रविडने आपल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९९६-९७ च्या मोसमात श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात केली. विनोद कांबळीच्या स्थानावर द्रविडचा संघात समावेश केला गेला. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये केवळ २१ धावांच्या कामगिरीमुळे द्रविडला एकदिवसीय संघातले आपले स्थान गमवावे लागले. संजय मांजरेकरच्या दुखापतीमुळे द्रविडला इंग्लंड दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ९५ धावांची सुरेख खेळी केली. मांजरेकरच्या पुनरागमनानंतरही द्रविडने कसोटी संघातले आपले स्थान राखले. १९९६-९७ च्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात जोहान्सबर्गच्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळताना द्रविडने आपले पहिले कसोटी शतक झळकावले. या सामन्यात १४७ आणि ८१ धावांच्या बहारदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीर घोषित केले गेले. याच मोसमात त्याने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुध्द खेळताना आपले पहिले अर्धशतक फटकावले.
पहिल्या १८ महिन्यांत द्रविडने ५६.७ च्या सरासरीने ९६४ धावा जमवल्या. १९९९च्या सुरुवातीस न्यूझीलंडविरुध्दच्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करून विजय हजारे आणि सुनील गावसकर यांच्यानंतर असा पराक्रम करण्याची कामगिरी केली. या सामन्यात द्रविडने तब्बल ६५३ मिनिटे किल्ला लढवून १९० आणि नाबाद १०३ धावा काढल्या आणि भारताला तो सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाले. धावफलक
२००१ च्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीतील १८० धावांची खेळी आणि व्ही.व्ही.एस्. लक्ष्मण बरोबर पाचव्या गड्यासाठीची भागीदारी भारताच्या विजयात अत्यंत मोलाची ठरली. त्या सामन्यात भारताने फॉलो-ऑन मिळाला असतानाही विश्वविजेत्या संघावर विजय मिळवला.
(अपूर्ण)
|
क्रिकेटच्या कसोटी सामन्यांत ५०च्या वर धावांची सरासरी असलेले भारतीय फलंदाज |
|
|
|
|
|
एकदिवसीय सामन्यात १०००० किंवा अधिक धावा काढणारे फलंदाज |
|
|
|
|