यशवंतराव चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यशवंतराव बलवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाण

यशवंतराव चव्हाण


कार्यकाळ
मे १, इ.स. १९६० – नोव्हेंबर १९, इ.स. १९६२
राज्यपाल श्री प्रकासा
(१९५६–१९६२)
पी. सुब्बारायण
(१९६२)
पुढील मारोतराव कन्नमवार

कार्यकाळ
इ.स. १९७४ – इ.स. १९७७
पंतप्रधान इंदिरा गांधी
मागील सरदार स्वर्ण सिंह
पुढील अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ
इ.स. १९७१ – इ.स. १९७५
मागील इंदिरा गांधी
पुढील चिदंबरम सुब्रमण्यम

जन्म मार्च १२, इ.स. १९१३
कराड, महाराष्ट्र, भारत
मृत्यू नोव्हेंबर २५, इ.स. १९८४
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष अखिल भारतीय कांग्रेस
निवास कराड
शाळा/ महाविद्यालय/ विद्यापीठ कराड
व्यवसाय राजनितिज्ञ
धर्म हिंदू धर्म

यशवंतराव चव्हाण (मार्च १२, इ.स. १९१३:कराड, महाराष्ट्र - नोव्हेंबर २५, इ.स. १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

गुणांच्या बळावरच त्यांनी गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा ते राष्ट्रीय नेते अशी झेप घेतली. सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी इ.स. १९१३ मध्ये जन्मलेल्या यशवंतरावांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी-निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवास भोगला. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) इ.स. १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.

इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .

- पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)

- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)

- कोल्हापूर बंधार्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)

- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)

- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व शिवाजी विद्यापीठाची स्थापना. (शैक्षणिक विकास)

- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)

- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींपासून ते ना. धो. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते. कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो.

मागील
पद स्थापित
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मे १, इ.स. १९६० - नोव्हेंबर १९, इ.स. १९६२
पुढील
मारोतराव कन्नमवार
मागील
सरदार स्वर्ण सिंह
भारतीय परराष्ट्रमंत्री
इ.स. १९७४ - इ.स. १९७७
पुढील
अटलबिहारी वाजपेयी
मागील
इंदिरा गांधी
भारतीय अर्थमंत्री
इ.स. १९७१- इ.स. १९७५
पुढील
चिदंबरम सुब्रमण्यम




वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये