भास्कराचार्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
{{{पूर्ण नाव}}}
{{{चित्र}}}
ऊर्फ {{{ऊर्फ}}}
जीवनकाल {{{जीवनकाल}}}
आई-वडील {{{आई-वडील}}}
पती/पत्नी {{{पती/पत्नी}}}
शिक्षण {{{शिक्षण}}}
कार्यक्षेत्र {{{कार्यक्षेत्र}}}
गौरव {{{गौरव}}}


भास्कराचार्य हे एक महान भारतीय गणितज्ञ होते.त्याच्या वडिलांचे नाव महेश्वर होते, व तेसुद्धा गणितात निष्णात होते. तेच भास्कराचार्याचे गुरू होत. भास्कराचार्यांचे जन्मगाव सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेले विज्जलविड हे होते. त्यांचे गोत्र शांडिल्य होते, असे त्यांनीच त्यांच्या 'गोलाध्याय' या ग्रंथात श्लोकरूपात नमूद केले आहे. ते शके १०३६मध्ये(इ.स.१११४) मध्ये जन्मले व त्यांनी वयाच्या ३६व्या वर्षी आपला 'सिद्धान्त शिरोमणी' हा ग्रंथ लिहिला.

ग्रंथरचना [संपादन]

  • लीलावती: अंकगणितावर लिहिलेले पहिले पद्धतशीर पुस्तक. याची अनेक भाषांतरे झाली आहेत.
  • सिद्धान्त शिरोमणी
  • गणिताध्याय
  • गोलाध्याय
  • करणकुतूहल

भारत देशात २ भास्कर होऊन गेले...पहिले भास्कर इ.स.५५० मधे जन्मले अणि इ.स.६२८ मध्ये ट्यांचा देहान्त झाला. सिद्धान्त शिरोमणी लिहिणारे हे भास्कर नव्हेत. हे भास्कर, भास्कर-१ किंवा भास्कराचार्य-१ म्हणून ओळखले जातात. सिद्धान्त शिरोमणि अणि लीलावती लिहिणारे भास्कर ( भास्कर किंवा भास्कराचार्य-२ ) इ.स.१११४ मधे जन्माला आले. लोक त्यांच्या सिद्धान्त शिरोमणी या ग्रंथाबद्दल मजेने असे म्हणायचे की सिद्धान्त शिरोमणी वाचून तुम्ही एखाद्या झाडावर किती पाने आहेत तेसुद्धा सांगू शकता. या वरून तुम्हाला त्याच्या ग्रंथाची महानता लक्षात येईल. पण त्यांच्या बीजगणित या ग्रंथाची आजपर्यंत सर्वात जास्त भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. बीजगणित या ग्रंथामध्ये भास्कराचार्यानी दिलेल्या अत्यंत कठीण अशा सूत्रांवरुन आपल्याला त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची कल्पना येते. गणिताची आवड असलेल्या प्रत्येक माणसाने त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे.