भारतीय राष्ट्रध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Flag of India.svg

भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, अंगिकारला गेला. भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढराहिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.

भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

अशोक चक्र

रचना [संपादन]

पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढराहिरवा हे तीन रंग आहेत. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.

रंग भावना
गडद भगवा त्याग
पांढरा शांती
हिरवा समृद्धी
निळा चोविस तास