विठ्ठल लक्ष्मण कोतवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भाई कोतवाल या पानावरून पुनर्निर्देशित)

विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल हे रायगड जिल्ह्यातील समाजसेवक व स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांनी सशस्त्र क्रांतीचाही अवलंब केला. ते समाजसुधारक आणि क्रांतिकारक होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 2 जानेवारी 1943 रोजी सिद्धगडच्या जंगलात ते आपल्या टीमसह भूमिगत असताना ब्रिटीश पोलीस अधिकारी डीएसपी आर. हॉल यांच्याशी झालेल्या चकमकीत ते मारले गेले.[१]

भाई कोतवाल
[[चित्र:
Bust of Bhai Kotwal
|200px]]
टोपणनाव: विठ्ठल लक्ष्मण कोतवाल
जन्म: १ डिसेंबर, इ.स. १९१२[२]
मृत्यू: २ जानेवारी, इ.स. १९४३


जन्म व शिक्षण[संपादन]

हुतात्मा भाई कोतवाल यांचे माथेरान हे जन्मस्थान होय. एल.एल.बी झालेल्या भाईंनी देशप्रेमाने प्रभावित होउन स्वतःला देशकार्यास वाहून घेतले. विठ्ठल कोतवाल यांचा जन्म 1 डिसेंबर 1912 रोजी रायगड जिल्ह्यातील मुंबईजवळील माथेरान येथे झाला. तो गरीब न्हावी कुटुंबातील होता. स्थानिक शाळेत शिकल्यावर चौथ्या इयत्तेपर्यंत ते तिथेच राहिले आणि 1936 मध्ये पुण्यातून पदवी प्राप्त केल्यानंतरच ते परत आले. ते सर्वात मोठे होते आणि त्यांना तीन बहिणी होत्या. स्थानिक शाळेत चौथी इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, तो पुण्याला तिची मावशी गौरूताई हळदे यांच्याकडे गेला, जिथे त्याने वाडिया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याच्या व्हर्नाक्युलर मेट्रिक परीक्षेत तो संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिला आला. ते मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी मुंबईत कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९४१ मध्ये ते वकील झाले.

मृत्यू[संपादन]

विठ्ठल कोतवाल यांचा विवाह पुण्यातील इंदू तिर्लापूरकर यांच्याशी 1935 मध्ये झाला होता. त्यांना भरत नावाचा मुलगा होता जो वयाच्या 22 व्या वर्षी मरण पावला. श्री कोतवाल 1942 मध्ये भूमिगत असताना त्यांची मुलगी जागृती दोन महिन्यांच्या आत मरण पावली. त्यांच्या पत्नी इंदू कोतवाल यांचे 2012 मध्ये निधन झाले. वय 91.

सामाजिक कार्य[संपादन]

भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन बलिदान केले. त्यामध्ये हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या आझाद दस्त्याचे कार्य फार मोलाचे आहे.

तो काळ फार धामधुमीचा होता. दुसऱ्यामहायुद्धचा वानवा शिगेला पोहचला होता. असं असतांनाही ब्रिटिश भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या मागणीपुढे झुकायला तयार नव्हते. ८ऑगस्ट१९४२ रोजी आझाद मैदान येथील भाषणात महात्मा गांधींनी ब्रिटिशांना, 'भारतातून चालते व्हा !' असे ठणकावून सांगितले व देशवासीयांना 'करेंगे या मरेंगे'चा मंत्र देऊन, शेवटच्या लढ्यासाठी तयार राहण्याच आवाहन केले, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो देशप्रेमी या लढ्यात सहभागी झाले.. याच १९४२ च्या :चले जाव' चळवळीतील एक धगधगते अग्निकुंड म्हणजे वीर हुतात्मा भाई कोतवाल.

उसळत्या रक्ताने मातृभूला परवशतेच्या पाशातून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाच बलिदान देणाऱ्या मातृभूमीच्या या महान सुपूत्राचा जन्म १ डिसेंबर १९१२ रोजी आताच्या रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे झाला. अनंत अडचणी व अडथळे पार करत, अत्तीऊच्च धैर्य दाखवत, अपार परिश्रम करून ते बॅरिस्टार झाले. माती आणि माता यांच्याधी एकरूप होणं हा त्यांचा जन्मजात स्वभाव असल्याने मातृभूमीला परकियांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात झेप घेतली. देशाबद्दल ज्वलंत अभिमान आणि गुलामगिरीच पराकोटीचा तिटकारा यामुळे परकीयांच्या नोकरीचे जोखड पेलण्यापेक्षा समाज जागृत करण्यासाठी त्यांनी सामाजिक रूढी व जुनाट परंपरा या विरोधात लोकांमध्ये जागृती निर्माण केली, त्यांना अन्यायाच्या प्रतिकारार्थ लाढण्यासाठी धैय दिले. सर्वसामान्यांना तन, मन व धनाने सशक्त केलं. समाजाला आर्थिक शिस्त लागावी यासाठी स्वतःच्या बहिणीचं; राधाबाईच लग्न केवळ सत्तर रुपयात करून समाजात अनोखं स्थित्यंतर घडविले. सामाजिक प्रबोधनाच्या व परिवर्तनाच्या त्यांच्या या कार्यकृतीमुळे लोक त्यांना आदराने अण्णा म्हणू लागले.

वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीची सर्वांनाच इतकी सवय झाली होती की देव, देश, धर्म हा विचार जणू काही लोप पावला होता. सारे राष्ट्र अगतिक व निराधार झाले होते. अखंड चालणाऱ्या पिळवणुकीमुळे दारिद्रे अपार वाढले होते. राष्ट्रातील सारी प्राणयात नष्ट झाली होती. अशावेळी हिंदपुत्रांमध्ये नवतेज निर्माण करण्यासाठी, यांच्यात स्वातंत्र्य लालसा जागृत करण्यासाठी अण्णांनी त्यांना संघटित करण्यास सुरुवात केली. गरीब शेतकऱ्यांना, काष्टकऱ्यांना जागृत करायचे, अज्ञानाच्या पाशातून त्यांना बाहेर काढायचे तर सर्वप्रथम त्यांना शिक्षण दिले पाहिजे या विचारांनी त्यांनी बाळासाहेब ठोसर यांच्या सहकार्याने कर्जत तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून ४२ व्हॉलंटरी शाळा सुरू केल्या. शेतकऱ्यांना सरंजमशाहीच्या दृष्ट चक्रातून बाहेर काढण्यासाठी, गोरगरिबांची होणारी उपासमार थांबविण्यासाठी, धान्यतुटवडा टाळण्यासाठी भाऊसाहेब राऊत यांचा मदतीने 'धान्यकोठी' ही अभिनव योजना सुरू केली. वकिलीचा मध्येमातून जुलमी सावकारांच्या नांग्या ठेचल्या. पतपेढी, वाचनालय व व्यायामशाळांच्या माध्यमातून समाज सुसंघटित व सामर्थेशाळी बनविला.

चलेजाव चळवळीतील 'करेंगे या मारंगे' या आदेशाने आपल्या सहकाऱ्यांसमोर आवाहन केले, "स्वराज्य हवे असेल तर आपण आपल्या सर्वस्वाच बलिदान देण्यास तयार रहा." आणि या आवाहना सरशी गुलामगिरीचे सर्व पाश उध्वस्थ करत देशभक्तीचे एक दैदिप्यमान पर्व सुरू झाले, यातूनच पुढे क्रांतिकारकांच्या पुरुषार्थाची गाथा उभी राहिली. लोहकण जसे लोहचुंबकाकडे आकर्षिले जातात, तसेच अण्णांच्या उत्युंग व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी नेतृत्व गुणांमुळे त्यांना असंख्ये सहकारी मिळाले. त्यातूनच पुढे निधड्या छातीचा कोतवाल गट अर्थात 'आझाद दस्ता' तयार झाला. या आझाद दस्त्यात, स्वतः भाई उर्फ अण्णासाहेब कोतवाल, गोमाजी पाटील, हिराजी पाटील, झिपरु गवळी, राघो नागो भगत, धोंडू देसाई, मारुती शेलार, धाकू डुकरे, काळू दळवी, नथू भोईर, वामन भोईर, देहू कानोजे, राघो गाडे, आप्पा शेंडे, भास्कर तांबट, उत्तरेतील रामलाल श्रीवास्तव, दक्षिणेतील गोपाळ शेट्टी, कांतरा शेट्टी, काठेवाडचा शशीलाल दलाल, राजकोटाचा चंद्रकांत गुजराथी आणि इक्या पुतळ्या कातकरी ही होता. असे अनेक ... अनेक जातीचे , धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या प्रांतातील भिन्न भाषा बोलनारे देशभक्त एका उदात्त ध्येयासाठी एकत्र आले. 'आपण सारे एक आहोत. आपले विचार एक आहेत, आपलं ह्रदय ही एक आहे. आपण आपलं ध्येय नक्कीच साध्ये करू. आपण सारे मिळून परकीय शत्रूला देशातून हुसकावून लावू.' या जाणिवेतून हे मातृभक्त इंग्रजांविरुद्ध लढू लागले. ब्रिटिश शासनाला जेरीस आणण्यासाठी, सरकारी काचेरीवर हल्ला करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे रुल उखडणे, विजेचे पायलन पाडणे अशी कितीतरी जीवावरची कामे हे क्रांतीवीर करू लागले. स्वातंत्र्य संग्रामात इरेला पेटलेले हे वीर ब्रिटीशांच्या जाळ्यात अडकणे केवळ अशक्यच. कधी रानावणातून, कधी, नदीपात्रातून तर कधी डोंगर वस्त्यांतून आश्रय घेत ते ब्रिटिशांना गुंगारा देत होते.

ऑगस्ट क्रांतीचा वानवा आता शिगेला पोहचला होता. इंग्रजांच्या साम्राज्याला सुरूंग लावणाऱ्या आझाद दस्त्याने शिवरायांच्या गनिमी काव्याचा अवलंब करून सिद्धगडचा आश्रय घेतला आणि मराठेशाहीच्या साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा एकदा सिद्धगड जागा झाला, परंतु पुन्हा एकदा गद्दारीचा कोळसा उगळला गेला. क्रांतिकारकांच्या वस्तीस्थानाच्या बातम्या इंग्रजांना पुरवल्या गेल्या. आझाद दस्त्याच्या ठाव-ठिकानाचा सुगावा अखेर इंग्रजांना लागला आणि २ जानेवारी १९४३ची ती रात्र क्रांतिकारकांसाठी काळरात्र ठरली. मुरबाडच्या लाल मातीत आपल्या लाल रक्तानं लाल क्रांती करून वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांनी भारत मातेला स्वातंत्र्याचा अभिषेक घातला. लाख मोलाच्या दोन नरवीरांच्या रक्तानं सिद्धगडची माती पवित्र पावन झाली.

मुरबाडच्या मातीतील सिद्धगड हे या जगातील अमृतालाही अमर करणार क्रांतीतीर्थ आहे. जगाच्या पाठीवर अनेक तीर्थक्षेत्र असतील पण मानवी अंतरंगात जाज्वल्य देशभक्ती निर्माण करणारं, कसं जगावं आणि कशास्तव मरावं हे सांगणार सिद्धगडासारखं स्फूर्ती स्थान नाही. मातृभूमीच्या मुक्तीसाठी आपल सर्वस्व अर्पण करणारे आमचे हे युगपुरुष न्यायी होते, विवेकी होते, विचारी होते; मानवतेचा कैवार घेणारे ते मानवतावादी होते, समाजसुधारनेचा पाया घालणारे ते समाजवादी होते आणि स्वर्गाहूनही स्वातंत्र्ये प्रिय असणारे क्रांतीवादी होते. राष्ट्रसंकट ओढवल्यावर त्या विरोधात लढावं कस, शत्रूशी भिडाव कस याचा धडाच आमच्या या शूरवीरांनी सिद्धगडच्या लाल मातीत गिरवला आहे. त्यांच्या रक्तमासान या मातीच पावित्र्य भस्मात रूपांतर झाले आहे.

बलिदानाची ही गाथा अमर आहे. तुम्ही आम्ही आज मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत कारण सिद्धगडच्या मातीत त्यांनी आपलं रक्त सांडल आणि गुलामगिरीच्या भोगातून स्वातंत्र्याचा योग आमच्या झोळीत दान केला. मुक्तीची ही ज्योत कायम ठेवत ठेवण्यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी चालेल. भारतभूला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हुतात्मा भाई कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सकळ सुखाचा त्याग केला. केवळ सुखभोगच नाही तर सतीप्रमाणे त्यांनी आपले प्राणही सहज झुंगारून दिले. म्हणूनच तर तुम्हा आम्हाला हेवा वाटावा असा इतिहास निर्माण झाला. आमच्या या नरवीरांनी स्वर्गातूनही स्वातंत्र्य प्रिय मानलं, त्यासाठी आपल्या सर्वस्वाचही प्रसंगी दान केलं. आम्हालाही स्वातंत्र्याची किंमत चुकवावी लागेल. आणि ती किंमत म्हणजे देशाप्रती समर्पण, कर्तव्यतत्परता आणि जबाबदारीची जाणीव.

सशस्त्र क्रांतीकार्य[संपादन]

शेतकरी, आदिवासी यांच्यासाठी झटत असलेल्या भाईंनी सशस्त्र क्रांतिचा मार्ग अंगीकारला. रायगड परिसरामध्ये त्यांनी आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली. भाई व त्यांचे साथीदार हिराजी पाटील, भास्कर तांबट, भगत मास्तर, यशवंत क्षीरसागर, बंडोपंत क्षीरसागर, चांदोबा देहेरकर यांनी संदेशवहन व विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तोडून, इंग्रजांची दळणवळण व्यवस्था कोलम्डून टाकण्यासाठी तारा वाहून नेणारे डोंगरांवरचे मनोरे (पायलन)पाडायला आरंभ केला. उतरणीवर असलेल्या मनोऱ्याचे वरच्या अंगाचे तीन पाय कापले की उतरत्या भागाकडील पायावर सर्व भार पडून मनोरा कोसळून जमीनदोस्त होत असे. मनोऱ्यावरील तारा तुटताच वीजपुरवठा खंडीत होत असे, संदेशवहन बंद पदत असे. १ जानेवारी १९४३ रोजी एका फितुराने दिलेल्या खबरीवरून पोलीस अधीक्षक हॉल स्वतः जातीने १०० सशस्त्र पोलीस घेऊन नेरळपासून (ता. कर्जत) जवळ असलेल्या सिद्धगडावर आला आणि त्याने गडाला वेढा घातला. गडावरील क्रांतिकारकांना दूध देण्यासाठी जाणाऱ्या गवळ्याचा पाठलाग करत पोलीस गडावर पोहचले व त्यांनी गोळीबार सुरू केला. भाई आणि हीराजी पाटील यानी मोठ्या शिळेआड लपून अखेरपर्यंत प्रतिकार केला. दोन तास झालेल्या चकमकीनंतर भाई व हीराजी यांना हौतात्म्य प्राप्त झाले. जखमी भगत मास्तर तिसऱ्या दिवशी शहीद झाले.

राजकीय कारकीर्द[संपादन]

विठ्ठल कोतवाल माथेरान नगर परिषदेची निवडणूक यशस्वीपणे लढले आणि 1941 मध्ये उपाध्यक्ष झाले.

स्वातंत्र्य लढा[संपादन]

पुण्यातील महाविद्यालयीन जीवनापासून स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरित असले तरी, विठ्ठल यांच्यावर देशातील सामाजिक कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांना कॉम्रेडचा भारतीय प्रतिशब्द म्हणून "भाई" असे संबोधले जात असे. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना "भारत सोडा" असे सांगितले तेव्हा ते पूर्णपणे गुंतले आणि भूमिगत झाले. भारतातील सर्व प्रमुख नेत्यांच्या अटकेनंतर भाई कोतवाल यांच्या नावाने अटक वॉरंटही जारी करण्यात आले. "माझ्या स्वतंत्र देशात किंवा स्वर्गात राहण्याची" शपथ घेऊन तो त्याच दिवशी भूमिगत झाला. तेव्हा ते माथेरानचे उपाध्यक्ष होते.

कोतवाल दस्ता[संपादन]

भूमिगत असताना त्यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात "कोतवाल दास्ता" नावाच्या भूमिगत भाडोत्री सैनिकांचा गट तयार केला. शेतकरी आणि स्वयंसेवी शाळेतील शिक्षक आणि त्यांचे चुलत भाऊ पेंटण्णा आणि दत्तोबा ​​हळदे यांच्यासह त्यांची संख्या सुमारे 50 होती. त्यांनी मुंबई शहराला वीजपुरवठा करणारे विजेचे तोरण तोडण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर 1942 ते नोव्हेंबर 1942 पर्यंत त्यांनी 11 तोरण पाडले आणि उद्योग आणि रेल्वे ठप्प झाली.

या धमकीचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांनी भाई कोतवालला अटक करण्यासाठी 2500 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. तसेच भाई कोतवालचा मुकाबला करण्यासाठी विशेष अधिकारी डीएसपी आर. हॉल आणि ऑफिसर स्टाफर्ड यांना पाचारण करण्यात आले.

क्रांतिकारी कोतवाल दस्ता मुरबाड तालुक्यातील सिद्धगडच्या दुर्गम जंगलात लपून बसला असताना त्याने मदतीचे पत्र पाठवले जे तेथील एका जमीनदाराच्या हाती लागले आणि त्याने ते पत्र व संदेशवाहक अधिकारी दालनाकडे वळवले. क्रांतिकारी म्हणतो त्याचा भारतीय सैनिक

अंतिम सामना[संपादन]

2 जानेवारी 1943 रोजी पहाटे आझाद दस्ता दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या तयारीत होता आणि मदत येण्याची वाट पाहत होता, तेव्हा आर. हॉल आणि स्टॅफर्ड यांनी दस्ता सदस्यांवर हल्ला केला. आझाद दस्ताचे उपनेते गोमाजी पाटील यांचा मुलगा हिराजी पाटील हे पहिले पडले. यात हिराजीचा जागीच मृत्यू झाला. भाई कोतवाल यांच्या मांडीला दुखापत झाल्याने त्यांना हालचाल करता आली नाही. हॉलने त्याला पॉइंट ब्लँक मारले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक कमी ज्ञात स्वातंत्र्यसैनिकांपैकी ते एक होते. त्याच्या शूर लढ्या आणि बलिदानासाठी त्याला आता अभिमानाने "वीर भाई कोतवाल" म्हणजेच योद्धा म्हटले जाते.

लोकप्रिय संस्कृतीत[संपादन]

24 जानेवारी 2020 रोजी, भाई कोतवाल यांच्या जीवनावर शहीद भाई कोतवाल नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला.

अनुवाद कार्य[संपादन]

भाई कोतवाल यांनी योगी श्रीअरविंद लिखित द मदर या ग्रंथाचे भाषांतर केले होते. जगदंबा या नावाने ते प्रकाशित करण्यात आले होते.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ महाराष्ट्र राज्य गॅझेटियर : रायगड जिल्हा. दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन. १९८९. pp. १८४ ते १८८.
  2. ^ ग्रेट मराठी. "इंग्रजांविरुद्ध स्वतःच्या तालुक्याचं सरकार बनवणारा माणूस – भाई कोतवाल". http://greatmarathi.com/. Archived from the original on 2020-01-26. 26 जानेवारी 2020 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ जगदंबा, भाई कोतवाल, १९३० च्या सुमारास लेखन

बाह्य दुवे[संपादन]