दासबोध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दासबोध समर्थ रामदासांनी लिहिलेला ग्रंथ आहे. दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी,त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींकरवी लिहविला. रायगड जिल्ह्यातील शिवथरची घळ या घटनेची साक्ष देत आजही अत्यंत निबीड अरण्यात विसावलेली आहे. दासबोध हा ग्रंथ एकुण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.

एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांना,साधकांना,निस्पृहांना,विरक्तांना,सर्व

सामान्यांना,बालकांना,प्रौढांना,जराजर्जरांना,सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना,मानवी मनाला उपदेश

केलेला आहे.

या ग्रंथाचे पारायण देखील करतात. [१] समर्थ रामदास स्वामींनी दसबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...

भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥

वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।मनकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥

वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥

ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

याची प्रत मराठी विकिस्रोत च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
त्रूटी उधृत करा: पानामधे <ref> (संदर्भ) आहे, परंतु <references/> ({{संदर्भयादी}}<nowiki />) सापडले नाही. <nowiki>{{संदर्भयादी}}<nowiki /> असल्याशिवाय पानाच्या तळाशी संदर्भांचे तपशील दिसणार नाहीत.</strong>