सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीन च्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते...
रोबर्ट कॉख हे जर्मनीचे आधुनिक जीवशास्त्राचे प्रणेते मानले जातात. त्यांनी क्षय रोगाबद्दल महत्वपूर्ण संशोधनाबद्दल केले त्यांना त्याबद्दल १९०५ मध्ये नोबेल पारितोषीकाने सन्मानित करण्यात आले...
रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटीश वंशीय डॉक्टर होते. भारतातील वास्तव्यात त्यांनी मलेरियावर महत्त्वपूर्ण संशोधन केले. या कामगीरीसाठी त्यांना १९०२ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले....
हरगोविंद खुराना (इ.स. १९२२- नोव्हेंबर ९, इ.स. २०११) भारतीय जैव-रसायनशास्त्रज्ञ. हरगोविंद खुराना हे भारतात जन्मलेले शास्त्रज्ञ आहेत. जनुकीय रचना व प्रथिनांच्या रचनेमधील त्यांचा महत्वाची कडी शोधण्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना १९६८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते....
चरक चरक (जन्म इ.स.पू. ३००) हे एक आयुर्वेदावरील प्रमुख योगदानकर्ते होते. भारतात पूर्वी त्यांचे नाव गाजत होते. त्यांचा उल्लेख कधी कधी शरीरशास्त्राचे पितामह म्हणून होतो. चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी अवयवांचा अभास केला. त्याने शरीरात दातांसह हाडांची संख्या ही ३६० सांगितली. हृदय म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकीचे अनुमान होते पण त्याने हृदयास नियंत्रण केंद्र मानले ते सर्वथा बरोबर होते. त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे. याव्यतिरिक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या नसा आहेत. त्या उतीला अन्नरस पुरवितात व टाकाऊ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करून देतात. त्याने असेही नमूद केले की या प्रमुख वाहिन्यांस (नसांना) कोणताही अडथळा आल्यास तो शरीरात रोगोत्पत्ती वा व्यंग निर्माण करतो.
भारतातील प्राचीन वैद्य अत्रेय व अग्निवेश यांच्या मार्गदर्शनाखाली इ.स.पू. ८व्या शतकात लिहिल्या गेलेल्या विश्वकोषीय पद्धतीच्या लेखनात चरकाने सुधारणा करून 'चरक संहिता' म्हणून पुनर्लेखन केले. या संहितेला पुष्कळ प्रसिद्धी मिळाली. गेली दोन शतके आयुर्वेद या विषयावर त्याचे हे लेखन प्रमाण मानले जाते. अरबी व लॅटिन यांसह अन्य विदेशी भाषांमध्ये चरकसंहितेचे भाषांतर झाले आहे.