दत्ता टोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दत्ता टोळ
जन्म नाव दत्तात्रेय टोळ
टोपणनाव अमरेंद्र दत्त
जन्म २१-१२-१९३५
महाराष्ट्र, भारत
मृत्यू महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी

दत्ता टोळ (जन्मदिनांक : २१ डिसेंबर, इ.स. १९३५; अज्ञात - हयात) हे मराठी लेखक आहेत. त्यांचे काही लिखाण अमरेंद्र दत्त या नावाने केलेले आहे.

दत्ता टोळ हे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अनेक वर्षे कार्यकारी विश्वस्त होते. ते नातू फाउंडेशनचेही विश्वस्त आहेत. इ.स. २००० साली अहमदनगर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली.

दत्ता टोळ यांचे साहित्य[संपादन]

अंक मोजू या, अच्च्या अन्‌ बच्चा, अट्टी गट्टी फू, अमृतपुत्र विवेकानंद, असे होते नामदार गोखले, आपले बापू, आम्ही जिंकलो, आळशांचा गाव, इतिहासातील सोनेरी पाने, इसापच्या रंजककथा, उपेक्षित मने, एक मन एक रूप (पुरस्कारप्राप्त पुस्तक), एक होते चक्रमपूर, एका वेड्याने अनेकदा (कथासंग्रह), ऐका कहाणी धरणीची, कल्पनाराणी, कारगीलच्या युद्धकथा, कुरूप राजहंस, खानाची फजिती, खेळण्यांची दिवाळी, गमतीचे पंचांग, गाऊ त्यांना आरती, गोड पाण्याचे बेट (कादंबरी, सहलेखक : अशोक आफळे), छोटा लाल, जय बांगला, जय मृत्युंजय, जादूची करामत, जादू संपली (कादंबरी), जिद्दी मुले, टॉक बहादूर, तेजस्वी पत्रे, दलितांची आईबाबा, धाडसी बालके, न रडणारी राजकन्या, नव्या युगाचा मनू, परीसराणीची कहाणी, पुंगीवाला, बागुलबुवा गेला, बालोद्यान, बिरबलाच्या चातुर्य कथा, भले बहाद्दर, भारतभूमीचे शिल्पकार-लालबहादुर शास्त्री, भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भूत नाही जगात, भिरभिरे, मला वाटते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराष्ट्राचा महापुरुष-जोतिबा फुले, महाराष्ट्राचे मानकरी, मुलगा पाहिजे (प्रौढांसाठी एकांकिका), मुलांसाठी पंचतंत्र, मुलांसाठी हितोपदेश, मृत्यंजयाचा बाजीराव, मृत्युंजयाच्या कथा, येरे येरे पैशा, लिंबू नाना टिंबू नाना, लोकांचा राजा शाहू महाराज (सहलेखक : अशोक आफळे), विवेकानंद, विज्ञान गंमत कथा, शंखनाद राक्षसांचा डोंगर, शहाणपणाच्या गोष्टी, शांतिदूत शास्त्रीजी, शाळा एके शाळा, शाळा नसलेला गाव (एकांकिका), सतेजकथा, संस्कारकथा, साहसी मुले, स्वर्गासाठी सहल, हे मृत्युंजय.