ज्ञानपीठ पुरस्कारविजेते
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारतर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ मध्ये हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आणि सन १९६५ पासून तो दरवर्षी देण्यात येतो. प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. सन २०१० साठी दिला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार हा ४६ वा होता.