जालना जिल्हा
| जालना जिल्हा जालना जिल्हा |
|
|---|---|
|
महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्हाचे स्थान |
|
|
|
|
| राज्य | महाराष्ट्र, |
| विभागाचे नाव | औरंगाबाद विभाग |
| मुख्यालय | जालना |
| तालुके | जालना • अंबड • भोकरदन • बदनापूर • घणसवंगी • परतूर • मंठा • जाफराबाद |
|
|
|
| क्षेत्रफळ | ७६१२ कि.मी.² |
| लोकसंख्या | १९,५८,४६३ (२०११) |
| लोकसंख्या घनता | २५७/किमी² |
| साक्षरता दर | ७३.६१ |
| लिंग गुणोत्तर | १.०७ ♂/♀ |
|
|
|
| जिल्हाधिकारी | तुकाराम मुंढे |
| लोकसभा मतदारसंघ | जालना (लोकसभा मतदारसंघ) |
| खासदार | रावसाहेब दानवे पाटील |
| पर्जन्यमान | ७६३ मिमी |
|
|
|
| संकेतस्थळ | |
जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.
जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घणसवंगी, परतूर, मंठा व जाफराबाद. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा गोदावरी नदीच्या खो-यात येतो. जिल्ह्याचा ७५% भाग खरिफ पीकांसाठी वापरला जातो ज्यातील ४०% रब्बी पीकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पीके आहेत. जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय जालना (शहर) असून ते महत्त्वाचे हातमाग व यंत्रमाग द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ति- समर्थ रामदास स्वामी, जनार्दन मामा, बद्रीनारायण बारवाले, दासू वैद्य इत्यादी.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- राजूर येथील श्री गणेश मंदीर, अंबड येथील मत्स्योदारी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).
[संपादन] संदर्भ
|
|||||||||||||||||||||||||