जागरण गोंधळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जागरण या पानावरून पुनर्निर्देशित)

जागरण गोधळ ही महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे.[१] जागरण हा एक विधी आहे ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर रात्रभर देवतेचे स्मरण करीत जागरण केले जाते.[२] लग्न किंवा शुभ प्रसंगी देवाला आमंत्रित करण्यासाठी जागरण केले जाते.खंडोबाच्या (खंडोबाच्या) सन्मानार्थ हा विधी सुरू झाला.

वाघ्या आणि मुरळी[संपादन]

Introduction of Gondhal (video-converter.com)

खंडोबा देवतेला नवस केल्यानंतर जी मुले जनमाला येतात त्यांना देवाचे भक्त म्हणून देवाला अर्पण केले जाते. अशा पुरुष भक्ताला वाघ्या स्त्री भक्ताला मुरळी म्हटले जाते. जागरण गोंधळ करून आपला उदरनिर्वाह करणे, देवाची सेवा करणे अशी कामे हे लोक्कलाकार करीत असतात.[३] महाराष्ट्रात देवी उपासक भक्तांमध्येसुद्धा जागरण गोंधळ परंपरा आधलून येते. नवरात्री उत्सवाच्या काळात, घरात शुभकार्य घडल्यास देवीचां गोंधळ घातला जातो.संध्याकाळी सूर्यास्त ते पहाटे सूर्योदय या काळात रात्रभर हा विधी सुरू असल्याने याला जागरण- गोंधळ असे म्हणतात.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Rannjan (IAS), Dr Manish (2023-08-19). Indian Art & Culture Book in English - Dr. Manish Rannjan (IAS): Indian Art & Culture Book in English - Dr. Manish Rannjan (IAS): Exploring Heritage and Tradition (इंग्रजी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5521-694-6.
  2. ^ Gaikwad, Dr Sayajirao Chhaburao (2019-01-01). Swatantryapurv Marathi Powada (Shivkal to 1947). Akshar Dalan Prakashan. ISBN 978-93-87576-04-9.
  3. ^ Paik, Shailaja (2022-10-25). The Vulgarity of Caste: Dalits, Sexuality, and Humanity in Modern India (इंग्रजी भाषेत). Stanford University Press. ISBN 978-1-5036-3409-1.
  4. ^ Marathi, TV9 (2021-10-09). "लोप पावत चाललेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करा, नाहीतर लोककला पुस्तकात बंदिस्त होतील!". TV9 Marathi. 2024-02-27 रोजी पाहिले.