जयपूर संस्थान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जयपूर संस्थान
इ.स. ११२८इ.स. १९४९
ध्वज चिन्ह
ब्रीदवाक्य: यतो धर्मस्ततो जयः
राजधानी जयपूर
शासनप्रकार राजतंत्र
राष्ट्रप्रमुख पहिला राजा: दुलहा राया
अंतिम राजा: सवाई मानसिंह (द्वितीय) (इ.स. १९22-४८)
अधिकृत भाषा राजस्थानी किंवा हिंदी

जयपूर संस्थान हे ब्रिटिश भारतातील राजपुताना स्टेट्स एजन्सीमधील एक महत्त्वाचे संस्थान अथवा राज्य होते. या राज्याची स्थापना १२ व्या शतकात झाली होती. याचे सन १९३१ मध्ये क्षेत्रफळ ४०,४०७ चौरस किमी इतके होते. ७ एप्रिल १९४९ या दिवशी हे संस्थान महाराजा सवाई मानसिंह (द्वितीय) यांनी भारत देशात विलीन केले.

जयपूरचा राजवाडा


जयपूरचे महाराजा[संपादन]

जयपूरचे महाराजा हे राजपूत असून ते कछवाहा वंशातील होते.

महाराजा कार्यकाल
मिर्झा राजा जयसिंह १७ वे शतक
रामसिंह १६६७-१६८८
भिषणसिंह १६८८-१६९९
सवाई जयसिंह २ १६९९-१७४३
ईश्वरीसिंह १७४३-१७५०
माधोसिंह १ १७५०-१७६८
पृथ्वीसिंह २ १७६८-१७७८
प्रतापसिंह १७७८-१८०३
जगतसिंह २ १८०३-१८१८
मोहनसिंह १८१८-१८१९
सवाई जयसिंह ३ १८१९-१८३५
सवाई रामसिंह २ १८३५-१८८०
सवाई माधोसिंह २ १८८०-१९२२
सवाई मानसिंह २ १९२२-१९४७