चिमाजी अप्पा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| चिमाजी अप्पा | ||
|---|---|---|
| पूर्ण नाव | चिमाजी बाळाजी भट | |
| जन्म | इ.स. १७०७ | |
| मृत्यू | इ.स. १७४१ | |
| वडील | बाळाजी विश्वनाथ | |
| आई | राधाबाई | |
| पत्नी | रखमाबाई, अन्न्पुर्णा | |
चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.