चर्चा:गुरुपौर्णिमा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

agreed. गुरुपौर्णिमा समास असल्याने रु र्हस्व असणे योग्य आहे. Ctcliff १९:३४, २२ जुलै २००८ (UTC)

व्यासपौर्णिमा-गुरुपौर्णिमा येथील मजकूर[संपादन]

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.

कलाक्षेत्रातसुद्धा या दिवसाला तसेच वेगळेआगळे महत्त्व आहे. संगीत क्षेत्रामध्ये ज्या गुरुकडून विद्या घेतली त्यांची काही सेवा किंवा घेतलेल्या विद्येबद्दलची कृतज्ञता श्रद्धापूर्वक या दिवशी व्यक्त केली जाते. ज्यांना या दिवशी अशा प्रकारे भक्तिभाव व्यक्त करणे शक्य होत नाही ते यानंतरच्या सोयीच्या दिवशी गुरुवंदनाचा कार्यक्रम करतात. गुरू आणि शिष्य हे एक अद्भुत नाते आहे. गुरू म्हणजे केवळ मास्तर नव्हे, गुरू म्हणजे केवळ शिकविणारा नव्हे. ज्याला आपल्या शिष्याबद्दल ममत्व वाटते, आपल्यापाशी असलेली ज्ञानसमृद्धी शिष्यापर्यंत पोहोचवावी अशी ज्याला तळमळ असते. शिष्याद् इच्छेत् पराजयम्। या वचनाप्रमाणे शिष्याने आपल्याही पुढे जावे अशी इच्छा जो मनोमन बाळगतो तो खरा गुरू.

आजकाल गुरुपूजनाचे कार्यक्रम खूप होत असले तरी सगळेच गुरू इतपत श्रेष्ठ दर्जाचे असतीलच असे म्हणता येत नाही. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गुरूला त्या उच्चतम गुरू-शिष्य परंपरेतील एक दुवा मानून त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेणे हा आपल्या संपन्न सांस्कृतिक परंपरेचा एक महत्त्वाचा तसेच अभिमानाचा भाग आहे.

व्यासपौर्णिमेलाच हे गुरुपूजन व्हावे ह्यात कोणता हेतू आहे ? कोणती योजना आहे ? व्यास हे सर्व गुरूंचे गुरू. परमगुरूंचे परमगुरू. व्यासांनी आपल्याला म्हणजे आपल्या भारतवर्षाला, आपल्या भारतीय संस्कृतीला खूप काही दिले आहे. त्यांनी वेदांचे विभाजन करून त्यांची नीट मांडणी केली हे तर खरेच. ब्रह्मसूत्रांच्या रूपाने त्यांनी अध्यात्मविचारांचा एक उत्तुंग हिमालय आपल्यासमोर उभा केला. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ त्यांनी लिहिला महाभारतातील व्यक्तिरेखा आपण आपल्या नेहमीच्या जीवनातही इतक्या सहजपणे शोधू पाहतो की, कर्णासारखा उदार, कृष्णासारखा कौतुकास्पद कारस्थानी, शकुनीमामासारखा कपटी, धर्मासारखा सच्छिल, भीमासारखा बलदंड, भीष्मासारखा प्रतिज्ञाबद्ध असे कितीतरी मानवी मनाचे आणि वर्तणुकीचे नमुने आपण महाभारतावरून नेहमीच्या बोलण्याचालण्यातही उचलत असतो. कौरव-पांडवांच्या युद्धाचा संदर्भ वारंवार दिला जातो. बळाने वा संख्येने कमी असूनही जर सत्य आणि न्याय आपल्या बाजूला असेल तर शेवटी आपलीच सरशी होणार, हा विश्वास महाभारताच्या आधाराने बळकट होऊ शकतो. बऱ्यावाईट वागण्याचे नमुने, विविध व्यक्तिरेखा महाभारतातून आपल्याला सतत भेटत राहतात. महाभारताचे हे भारतीयत्व आसेतुहिमाचल सर्वत्र आढळते.

भगवान श्रीकृष्णाच्या गोड लीलांचे आणि त्याच्या पराक्रमाचे वर्णन करतांना व्यासांनी मानवी भावभावनांची कितीतरी मनोहारी चित्रणे श्रीमद्भागवतात जाता जाता दाखविली आहेत. व्यासांनी महाभारतानंतर भागवत लिहिले, पुराणे लिहिली, नीतिशास्त्राचे केवळनियम सांगण्याऐवजी या बऱ्यावाईट शुभाशुभ भावभावनांचे मधुमधुर नर्तन आणि रौद्रभीषण तांडव विविध पौराणिक कथांतून आणि ऐतिहासिक घटनांतून त्यांनी आपणासमोर मूर्तिमंत उभे केले. नव्या पिढीने जुन्या पिढीपेक्षा अधिक उन्नत व्हावे, आयुष्याच्या वाटचालीत त्यांना महत्त्वाचे खाचखळगे आणि चढउतार विनासायास जाणून घेता यावेत आणि तेही मनोरंजक कथेच्या माध्यमातून समजावेत, हा कोणत्याही काळच्या शिक्षणशास्त्राला, कोणत्याही ठिकाणच्या गुरू-शिष्य परंपरेला आदरणीय वाटावा, असा थोर कित्ता व्यासांनी आपणासमोर ठेवला. व्यास हे गुरुजनांत सर्वश्रेष्ठ होते. या दिवशी कोणाही गुरुला केलेला नमस्कार गुरुकुल परंपरेचे परमपितामह महर्षि व्यासांनाच पोहोचत असतो.

या लेखात महर्षी व्यास यांच्याविषयी असलेली माहिती त्यांच्याविषयी असलेल्या स्वतंत्र लेखात वर्ग करता येईल असे वाटते. आर्या जोशी (चर्चा) २१:४७, १२ जून २०१८ (IST)[reply]

https://tools.wmflabs.org/copyvios/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 यानुसार या लेखात ८९% नकल-डकव आहे. --आर्या जोशी (चर्चा) ११:३३, ११ जुलै २०१९ (IST)[reply]