गावडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'गावडे' हे भारत देशात राहणाऱ्या मराठी समाजातले एक प्रचलित आडनाव आहे.गावडे सुर्यवंशी असुन मुळ सगर राजपूत मराठा आहेत. प्रामुख्याने पुणे तसेच जिल्हा,सांगली, कोल्हापुर तसेच कोकण मध्ये गावडे आडनावाची लोक राहतात. मुळ क्षत्रीय असल्यामूळे हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बरेच वेळा लढाई करून धर्म रक्षण केल्याचे आढळते.

13 व्या शतकात अल्लौद्दिन खिल्जीचा सरदार मलिक गफुर बरोबर झालेल्या लढाईत हिन्दुस्तानचा बळदंड योधा वीर करण सिंह गावडे व वीर भीमराव गावडे यांचा उल्लेख आढळतो.

सगर योद्ध्यांनी हिंदुस्थानवर आक्रमण करणारा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याशी घनघोर युद्ध केल्याचा इतिहास समोर आला आहे. नीरा-भीमा नदीच्या तटावर 20 जानेवारी 1311 साली झालेल्या घनघोर युद्धात करणसिंग गावडे या महावीरासह अनेकांना वीरगती प्राप्त झाल्याची नोंद युद्धगीतात आढळली आहे.

तरडोली येथे 1498 साली तुर्की आक्रमकांशी लढाई झाल्याचे नुकतेच समोर आले होते. आता युद्धगीते, दोहा या स्वरूपातील चार चौपाईया आढळल्या आहेत.

नीरा नदी बडी सोहामनी, भीमा घाट का मिठ्ठे नीर |

नीरा के तट मे लढे, वो करण गावडे महावीर ||

नीरा नदी सोहामानी, भीमा पाठ का मीठे नीर |

ऐसा नरसिंह गढी मे योद्धा बडा सगर गावडे करण वीर||

जहाँ आई सती और दत्त विराजे ।

दशनामी मंदिर एक आधार है ||

नीरा के तट पर सागरक्षात्र लडे है ||

बाजे नगरा युद्ध का यीर सागरक्षात्र सागरक्षात्र मैदान रमे ।

नीरा के तट मे लढे वो करण गावडे महावीर है ||

मेष फाइसगारदि वसे, पादया राजे फशपात फूल ।

यशामुर्य मूल वीर योद्धा करना ।

फुरहान भीमराव, लड़पा संग पडा रह्स्य ।

समपातारे पापरत राखले, महा दत्त मंदिर राह गवांदे ।

शूरवीर करणसिंह गावडे, रोकियो मलिक कळस ।

जय दुर्गा माते, नाद कयो सगर रशरत्र सौसगाथे ।

लाडिपा पूर शाह सांगे दुश्मन माथा बाहू चणारथे ।

खिलजी बादशाह को दियो घाव दौडगड हारके जाव ।

नरी विधवा व्रणहशे, हिंदू धर्म कियो याच कहाव ।

इस्डदात रोउडत रोरसा उडत आगे शीरसफल गावे फलागे ।

महागंगा, भीमा नीरा, सागरक्षात्र, बडाई अधिरा ।

ढगाई भक्त को सयाराम, दत्त पुजारी राजमुर्याम ।

शंखकोमलला करधा, करन गावडे गावडे महावीर वरधा ।

खुशरो अमिरे वधाधु गाव, बादशाह को दियो शँदेसाथ ।

भिपोहारी लढे खडे वीर, बलवीर गावडे पणेधीर ।

असे वर्णन असणारे युद्धगीत 1452 मध्ये अरुणसिंह याने गुरजातचा राजा मरतानजी वाघेला याच्यासमोर गायले असल्याचा उल्लेख आहे. 20 जानेवारी 1311 रोजी राजस्थान, देवगिरीचे पारिपत्य करून दक्षिणेकडे चाललेल्या मलिक काफूरच्या नेतृत्वाखालील अल्लाउद्दीन खिल्जीच्या सैन्याला माणगंगा-नीरा-भीमाच्या तटावरील योद्ध्यांनी गुणवडी येथे अडविले. जय दुर्गामाते अशा घोषणा देत योद्धे तुटून पडले. करणसिंह गावडे पुढे होत नूरशाहसोबत लढले आणि खिलजी बादशहाला घाव दिला. महिला विधवा झाल्या.

शीश कटा हाथ हरण, धड लडा गावडे करन | सौ सौ मारिया दुश्मन को, भीमराव करण दोनो बालवीर है ||

असे विरश्रीयुक्त वर्णन आहे. तीन पहर झालेल्या या घनघोर लढाईचा 'संदेशा' प्रसिद्ध मध्ययुगीन कवी अमीर खुसरो याने बादशहाला दिला असेही म्हटले आहे. याशिवाय "हिन्तवतनचा जवामर्द, शूरवीर तू शिरसुफल का" या उल्लेखांवरून तसेच "ऐसा नरसिंह गढी मे, योद्धा बडा सगर गावडे करणबीर" या उल्लेखावरून करनसिंह गावडे हे शिर्सुफळला सध्या अस्तित्वात असलेल्या गढीतील असावेत असा अंदाज केला जात आहे.

"दत्त दश मंदिर मूल, महादत्त मंदिरे राह गावडे" असा चौपाईयामधे उल्लेख आहे. गुनवडी येथील हे मंदिर आजही गावडे चा दत्तोबा म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आजही तीन 'सती' शिळा आहेत. चौपाईयामध्ये 'पद्मीनीनोने दिया देहदान' हा उल्लेख शिळांशी संबंध जोडणारा आहे.[१]

सोबतच पुणे जिल्ह्यात आम्बेगाव तालुक्यात असलेले गावडेवाड़ी हे गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते.या वर्णनानुसार गावडे घराणे हे मूळ मानले जाते

गावडे आडनावाच्या लोकांचे गोत्र कश्यप व उपगोत्र धामपाळ असल्याची नोंद काही पुस्तकांत आढळली आहे. हे ईश्वाकू हे कूळ असल्याचे सांगितले जाते. सौंडडी हे देऊक आहे.मुळात क्षत्रीय असुन सोबतच शेती करत असल्याने यांना 'शेतकरी' असा दर्जा मिळाला. ' गावडे' यांचे कुलदैवत ज्योतिबा असल्याची नोंद अनेक पुस्तकांतून आढळते. तसेच कूलदेवी तुळजाभवानी आहे.

गावडे आडनावाची कुटुंबे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेतच शिवाय या आडनावाचा अपभ्रंश होऊन महाराष्ट्राबाहेर इतर आडनावे देखील झाली आहेत.एवढेच पुरेसे नसून या आडनावापासून अनेक आडणावांचीदेखील निर्मिती झाली आहे व आता ही सगळी आडनावे स्वतंत्र आहे. पुरातन संदर्भ - काश्यप हे एक ऋषी होते. हे ऋषी पुराणात खूप प्रसिद्ध आहेत. सुर्यवंशात यांचा जन्म झाला म्हणजे गावडे मुळचे सुर्यवंशी आहेत. श्रीरामचंद्र देखिल सुर्यवंशी आहेत.छत्रपती शिवाजी महाराज देखील सूर्यवंशी घरण्यातीलच आहेत.

मूळ आडनाव - गावडे

  1. ^ "बारामतीत झालं होतं खिल्जीच्या सैन्याशी घनघोर युद्ध; 700 वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात". eSakal - Marathi Newspaper. 2022-04-05 रोजी पाहिले.