कालीदास स्मारक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कालिदास स्मारक या पानावरून पुनर्निर्देशित)

कालिदास हे दुसरा चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राजदरबारात इ.स. ४०० चे सुमारास असलेले राजकवी होते. अलकेचा अधिपती कुबेर याने त्याच्या एक यक्ष सेवकास हद्दपार केल्यामुळे तो रामगिरी (सध्याचे रामटेक) पर्वतावर येऊन राहू लागला अशी आख्यायिका आहे. या मधवर्ती कल्पनेस धरून महाकवी कालीदासाने मेघदूत हे काव्य रचले. त्याच रामटेकच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे कालिदासाच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्मारक बांधण्यात आले आहे. त्यात रेखीव व कोरीव असे नक्षीकाम केले आहे. या स्मारकाचे उदघाटन १२ डिसेंबर १९७३ साली करण्यात आले. या स्मारकात कालिदासाच्या मेघदूत, रघुवंश या साहित्यकृतीतील तसेच मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, कुमारसंभव तसेच शाकुंतल यांतील विविध प्रसंगावर आधारित तैलचित्रे, देशातील नामवंत चित्रकारांनी काढलेली आहेत.

पहा : कालिदास : कालिदास सन्मान पुरस्कार : कालिदास महोत्सव