औषधनिर्माण उद्योग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

औषधनिर्माण उद्योग हा एक जागतिक स्तरावरचा सतत वाढ होत असलेला उद्योग आहे. एक नवीन औषध बाजारात येण्यापूर्वी त्यावर अनेक वर्षे संशोधन होते, कोट्यवधी रुपये खर्च होतो. मनुष्यजातीसाठी ते सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. मगच औषधनिर्माण उद्योग औषध बाजारात विक्रीस आणू शकतो.या तयार झालेल्या औषधांचा दर्जा ,गुणवत्ता राखण्यासाठी भारतामध्ये अन्न व औषध प्रशासनाची निर्मिती केली आहे.हे प्रशासन औषध व अन्नपदार्थ तयार करण्यासाठी काही नियम व अटी बनवितात. ज्या कंपनीमध्ये हे नियम पाळले जात नाहीत त्या कंपनीचे परवाने रद्द करण्याचे सर्व अधिकार या प्रशासनाकडे राखीव असतात.

भारताची स्थिती[संपादन]

इ.स. १९४८ मध्ये भारतात औषधनिर्माण उद्योगामधील वार्षिक उलाढाल १० कोटी रुपये होती. इ.स. १९७२ मध्ये ३६० कोटी, इ.स. १९८० मध्ये १५०० कोटी व आज ती १ लाख कोटी रुपयांच्यावर गेली आहे. यापकी सुमारे ५५००० कोटी रुपये देशांतर्गत उलाढालीतून मिळतात. औषधनिर्माण उद्योगा मधून होणाऱ्या निर्यातीतून ४०००० कोटी रुपये मिळतात. एकूण निर्यातीत हा वाटा ५ टक्के आहे. अमेरिका, युरोप अशा प्रगत व खूप कठोर निकष असलेल्या देशातही भारतातून औषधांची निर्यात होते. औषधांच्या बाबतीत भारत पूर्णपणे स्वावलंबी असला तरी त्याला सुमारे ९००० कोटी रुपयांच्या औषधांची आयात करावी लागते. पण त्यामागे मुख्यत: ती स्वस्त पडतात किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना ते जास्त सोयीचे आहे अशी कारणे आहेत.

उत्पादन[संपादन]

डॉ. प्रफुल्लचंद्र रे यांनी इ.स. १८८२मध्ये बेंगाल केमिकल्स ॲन्ड फार्मास्यूटिकल्स ही ॲलोपॅथिक औषध निर्माण करणारी पाहिली भारतीय कंपनी सुरू केली. त्यापूर्वी भारतात फक्त परदेशी कंपन्याच होत्या. नंतर इ.स. १९०७ मध्ये अलेंबिक नावाची कंपनी सुरू झाली. इ.स. १९३५मध्ये सिप्ला ही कंपनी सुरू झाली व आज ती एक बलाढ्य कंपनी आहे. भारतात खुप ॲलोपॅथिक कंपन्या आहेत