औरंगाबाद विभाग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
औरंगाबाद विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. औरंगाबाद विभाग, मराठवाडा या नावाने सुध्दा प्रसिद्ध आहे.
चतुःसीमा [संपादन]
या विभागाच्या पश्चिमेस पुणे विभाग, पूर्वेस अमरावती विभाग, उत्तरेस नाशिक विभाग आणि अमरावती विभाग व दक्षिणेस आंध्र प्रदेश राज्य आहेत.
इतिहास [संपादन]
पुर्वी हा भाग सातवाहन राजांच्या ताब्यात होता. नंतर औरंगाबाद् जिल्हा हा मुख्यत्वेकरून् इस्लामिक् राजवटीखाली होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथल्या जनतेला स्वातंत्र्य् मिळाले नाही. तर त्यांना मराठवाड्यासाठी वेगळा लढा द्यावा लागला. निजामावर् जेंव्हा भारत सरकारने लष्करी कारवाइ केली तेंव्हा मराठवाडा स्वतंत्र झाला.
थोडक्यात माहिती [संपादन]
- क्षेत्रफळ - ६४,८११ किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - १,५५,८९,२२३
- जिल्हे - औरंगाबाद जिल्हा, बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, परभणी जिल्हा
- साक्षरता - ६८.९५%
- ओलिताखालील जमीन : ९,६११ किमी²
|
|||||||||||||||||||||||||