औरंगाबाद
| ?औरंगाबाद महाराष्ट्र • भारत |
|
| — शहर — | |
|
|
|
| गुणक: (शोधा गुणक) | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| क्षेत्रफळ • उंची |
१३८.५ km² (५३ sq mi) • ५१३ m (१,६८३ ft) |
| जिल्हा | औरंगाबाद |
| लोकसंख्या • घनता |
८,७२,६६७[१] (२००१) • ६,३०१/km² (१६,३२०/sq mi) |
| महापौर | सौ.अनिता नंदकुमार घोडेले |
| महानगरपालिका आयुक्त | डॉ.पुरुषोत्तम भापकर |
| कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४३१ • +0240 • MH-20 |
| संकेतस्थळ: औरंगाबाद महापालिका संकेतस्थळ | |
औरंगाबाद ( मराठी: औरंगाबाद, उर्दू: اورنگآباد), हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे, मध्यवर्ती महानगर आहे. वाहन उद्योग आणि पेयनिर्मितीचे ते भारतातील महत्त्वाचे केंद्र आहे. औरंगाबाद मराठवाडा महसुली विभागाचे मुख्यालय आहे. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे. औरंगाबादला दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. आजही जुन्या औरंगाबाद शहरात अशी अनेक महाद्वारे अर्थात दरवाजे आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादेत आहे. औरंगाबाद हे एक वेगाने वाढणारे शहर आहे..[२]
अनुक्रमणिका |
[संपादन] नामकरण
औरंगाबाद हे नाव औरंगजेब (इ.स. १६५९ - इ.स. १७०७) ह्या मोगल सम्राटाच्या नावावरून ठेवले गेले असावे. औरंगजेबाने दिल्लीपाठोपाठ आयुष्याचा मोठा काळ औरंगाबाद आणि परिसरातच व्यतीत केला. त्यापूर्वी औरंगाबाद आज जेथे वसलेले आहे त्या खाम नदीच्या तीरावर याच जागी खडकी नावाचे छोटसे ग्राम वसलेले होते.
[संपादन] इतिहास
काही इतिहासकारांच्या मते १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने हे शहर वसवले. मलिक अंबरने ह्या शहराचे नाव फतेहपूर ठेवले. १६३४ मध्ये औरंगजेब ह्या (खडकी / फतेहपूर) शहरात दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून आला. १६४४ मध्ये तो आग्र्याला परत गेला. त्या नंतर १६८१मध्ये औरंगजेब मोगल बादशाह असताना पुन्हा ह्या शहरात आला. १७०७ मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब इथेच राहिला. औरंगाबाद शहराजवळ असणाऱ्या खुलताबाद या छोट्याशा गावात औरंगजेबाची कबर आहे. १७०७ नंतर औरंगाबाद हैदराबादच्या निजाम राजवटीचा भाग म्हणून राहिले. इ.स. १८८९ मध्ये औरंगाबादेत पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली, त्यात सातशे जणांना रोजगार मिळाला. निझाम राज्यात हैदराबाद-गोदावरी व्हॅलि रेल्वेची सुरुवात झाल्यानंतर इ.स. १९०० च्या सुमारास शहर आणि परिसरात अनेक जिनींग कारखाने सुरू झाले.मलिक अंबरने इथे त्याच्या कारकीर्दीत एक पाणी-व्यवस्था उभारली होती, त्याच्या एका भागाचे नाव नहर-ए-अंबरी असे होते. तिचे अवशेष आजही दिसतात. तसेच येथे शहराच्या पाणचक्की भागात पुरातन लेणी कोरलेली आढळून येतात. ही लेणी सातवाहन काळातील असावीत असा अंदाज आहे.
[संपादन] भौगोलिक स्थिती आणि वातावरण
| माहिती हवामान तक्ता - औरंगाबाद | |||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| जा | फे | मा | ए | मे | जु | जु | ऑ | स | ऑ | नो | डी |
|
2.8
29
12
|
2.1
32
14
|
3.3
36
19
|
3.5
38
22
|
24.4
39
25
|
114.2
34
24
|
115.6
30
22
|
119.6
29
21
|
121.6
30
21
|
60.8
32
19
|
10.7
30
15
|
6.5
28
12
|
| तापमान °C मध्ये • पाउस मात्रा mm मध्ये दुवा: MSN Weather |
|||||||||||
|
इंपेरीयल कंव्हर्जन
|
|||||||||||
| हवामान तपशील: Aurangabad | |||||||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| महिना | जानेवारी | फेब्रुवारी | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टेंबर | ऑक्टोबर | नोव्हेंबर | डिसेंबर | वर्ष |
| सरासरी कमाल °से (°फॅ) | 29.7 (85.5) |
32.5 (90.5) |
36.1 (97) |
39.0 (102.2) |
39.9 (103.8) |
34.9 (94.8) |
30.3 (86.5) |
29.1 (84.4) |
30.4 (86.7) |
32.6 (90.7) |
30.9 (87.6) |
29.3 (84.7) |
३२.८९ (९१.२१) |
| सरासरी किमान °से (°फॅ) | 14.2 (57.6) |
16.3 (61.3) |
20.2 (68.4) |
23.7 (74.7) |
24.6 (76.3) |
23.0 (73.4) |
21.8 (71.2) |
21.1 (70) |
20.9 (69.6) |
19.7 (67.5) |
16.4 (61.5) |
14.0 (57.2) |
१९.६६ (६७.३९) |
| वर्षाव मिमी (इंच) | 2.2 (0.087) |
2.9 (0.114) |
5.1 (0.201) |
6.3 (0.248) |
25.5 (1.004) |
131.4 (5.173) |
167.0 (6.575) |
165.0 (6.496) |
135.3 (5.327) |
52.6 (2.071) |
29.3 (1.154) |
8.4 (0.331) |
७३१ (२८.७८) |
| संदर्भ: IMD | |||||||||||||
भौगोलिकदृष्ट्या औरंगाबाद उत्तर अक्षांश १९° ५३' ४७" - पूर्व रेखांश ७५° २३' ५४" या ठिकाणी वसलेले आहे. शहर चारही बाजूनीं टेकड्या आणि डोंगररांगांनी वेढलेले आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ५५० मीटर उंचीवर ते वसलेले आहे. शहरातही अनेक लहानमोठ्या टेकड्या आहेत. त्यामुळे पाऊस वाहून नेणाऱ्या नाल्यांचे जाळे औरंगाबादमध्ये आहे.
तापमान: औरंगाबादचे वार्षिक तापमान ९ ते ४० अंश सेल्शियसच्या दरम्यान असते. शहराला भेट देण्याचा आल्हाददायक काळ हा हिवाळ्यात, ऑक्टोबर ते मार्च हा आहे.[३]
पर्जन्यमान: पडत असलेल्या पावसापैकी सर्वाधिक पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान हे ७२५ मिलिमीटर आहे.
[संपादन] अर्थव्यवस्था
गुजरात आणि सिंधमधील व्यापारी ठाण्यांना दक्षिण भारतातील व्यापारी केंद्रांशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग औरंगाबादहून जात होता. याच मार्गावरचा महत्त्वाचा थांबा म्हणून औरंगाबाद विकसित झाले असावे असे मानता येते. शहरात गुजराती व्यापारी समाजाचे वास्तव्य ऐतिहासिक काळापासून आहे. कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅन्डर्ड सिल्कमिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.
[संपादन] उद्योगधंदे
स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, बिअर आणि व्हिस्की तसेच शीतपेयांची निर्मिती हा औरंगाबादमध्ये भरभराटीला आलेला उद्योग आहे. या दोन्ही क्षेत्रातील उद्योगधंदे औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याशिवाय चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने होत. औरंगाबादमध्ये निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिएस्टर्स ,औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादेत आहेत. वानगीदाखल त्यापैकी काहींची नावे अशी :
[संपादन] कला, संस्कृती
काही उल्लेखनीय मराठी नाटककारांचा औरंगाबाद शहराशी संबंध आहे. अजित दळवी यानी अखिल महाराष्ट्रात गाजलेली काही नाटके लिहिली, अलीकडे त्यांनी "कायद्याचं बोला" या चित्रपटाची पटकथा लिहिली. प्रतीक्षा लोणकर, चंद्रकांत कुलकर्णी, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, चिन्मयी सुर्वे अशा कलावंतानी आपल्या अभिनय-कारकीर्दीला आधी औरंगाबादला सुरूवात केली आणि मग ते मुंबईतील नाट्यक्षेत्रात चमकले. त्याआधी, कुमार, आलोक चौधरी, विजय दिवाण, त्र्यंबक महाजन अशा अनेक कलाकारांनी राज्य नाट्यस्पर्धा तसेच कामगार राज्य नाट्यस्पर्धा गाजवलेल्या व अनेकदा जिंकल्याही. 'वर्हाड निघालंय लंडनला' या विश्वविक्रमी नाटकाचे सर्वेसर्वा लक्ष्मण देशपांडे हेही औरंगाबादचे रहिवासी होते.
[संपादन] राजकीय
खासदार : चंद्रकांत खैरे ( शिवसेना )
आमदार :
- प्रदीप जैस्वाल (अपक्ष) औरंगाबाद मध्य
- राजेन्द्र दर्डा (काँग्रेस) औरंगाबाद पूर्व
- संजय शिरसाट (शिवसेना) औरंगाबाद पश्चिम
[संपादन] शासकीय
विभागीय आयुक्त : भास्कर मुंडे
जिल्हाधिकारी : कुणाल कुमार [४]
महानगरपालिका आयुक्त: डॉ.पुरुषोत्तम भापकर
[संपादन] प्रसिद्ध शिक्षण संस्था
[संपादन] विद्यापीठ
औरंगाबाद शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात असलेल्या शासकीय मान्यताप्राप्त संस्थांचा कारभार पाहाते.
[संपादन] अभियांत्रिकी |
[संपादन] वैद्यकीय
|
[संपादन] कला, वाणिज्य आणि विज्ञान
[संपादन] मॅनेजमेन्ट कॉलेज
|
[संपादन] प्रेक्षणीय स्थळे
|
|
¥1 - इथे अंदाजे १५०० सुफ़ी संताना दफनविण्यात आलेले आहे[ संदर्भ हवा ]
¥2 - मुघल शासनकालात औरंगाबादला ४ मुख्य व ९ इतर दरवाजे होते. यातील पैठण गेट आणि रोशन गेट प्रसिद्ध आहेत
[संपादन] संदर्भ
- ↑ २००१ औरंगाबाद महापालिका संकेतस्थळ.
- ↑ 11 Indian cities among worlds fastest growing.
- ↑ Maharashtra government web site
- ↑ औरंगाबादचे संकेतस्थळ.(इंग्लिश मजकूर) हा दुवा उघडल्यावर त्या संकेतस्थळावर 'Collector office' वर टिचकी मारा.
[संपादन] बाह्य दुवे
- औरंगाबाद एन.आय.सी
- औरंगाबाद महानगरपालिका
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
- इंग्लिश विकिपिडीयावर औरंगाबाद
- गॅझेटीयर
| उत्तर: जळगाव | ||
| पश्चिम: अहमदनगर | औरंगाबाद | पूर्व: जालना |
| दक्षिण: बीड |
|
|||||||||||||||||||||||||
|
|||||