ऋतुचर्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूचना : या लेखात वर्णन केलेले ऋतू भारतासारख्या खंडप्राय देशात वेगवेगळ्या कालावधीत येतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात वसंत ऋतू साधारणपणे १६ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत असतो. त्या काळात हिंदू पंचांगाप्रमाणे माघाचे काही दिवस, फाल्गुन पूर्ण आणि चैत्राचे काही दिवस असतात. या लेखात खाली लिहिले आहे त्याप्रमाणे वैशाख महिन्यात(म्हणजे इंग्रजी मे महिन्यात) वसंत ऋतू निश्चित नसतो. उत्तरी भारतात माघ महिन्याच्या शुक्ल पंचमीपासून वसंत ऋतूची सुरुवात होते असे समजले जाते. तेथे हा ऋतू फाल्गुन महिनाभर आणि चैत्राचे पहिले ४-५ दिवस असतो.

आयुर्वेदानुसार ढोबळ मानाने पाळायची ऋतुचर्या[संपादन]

वेगवेगळ्या ऋतूमध्ये करावयाचे आचरण/आहार विहारादि कर्म ही ऋतुचर्या होय. भारतात वेगवेगळ्या ऋतूंत वेगवेगळे वातावरण राहते. त्याला अनुसरून आहार विहार योग्य ठेवल्यास शारीरिक त्रास / रोग होत नाहीत. शरीर, मन सुदृढ राहते. सर्व कर्मे योग्य तऱ्हेनी करता येतात. आजारी पडून मग औषधे घेण्यापेक्षा ऋतुचर्येचे पालन करून रोगमुक्त राहणे केव्हाही चांगले.

वर्षाचे(year) दोन हिस्से आहेत.उत्तरायणदक्षिणायन. उत्तरायणात रात्र लहान व दिवस मोठा असतो. त्यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वनस्पतीसृष्टीमध्ये शक्तीचे शोषण होते. याविरुद्ध परिस्थिती दक्षिणायनात असल्यामुळे प्राणिमात्रांचे पोषणाचे काम या काळात होत असते. या अयनांचे(अयन=सूर्य)-उत्तरायण व दक्षिणायन-प्रत्येकी तीन उपविभाग होतात, ज्याला ऋतू म्हणतात. उत्तरायण -शिशिर,वसंत,व ग्रीष्म आणि दक्षिणायन-वर्षा,शरदहेमंत या प्रकारे ते ऋतू होत. आयुर्वेदातील दोषसंचय,प्रकोप व उपशमनासाठी याच सहा ऋतूंना मान्यता आहे. ऋतुसंधिकाल म्हणजे प्रत्येक ऋतू संपण्याचा शेवटला पंधरवडा व नवीन ऋतूचा पहिला पंधरवडा असा सुमारे महिन्याचा काळ.

वसंत[संपादन]

चैत्रवैशाख महिने - या वेळेस वातावरण प्रसन्न असते. थंड व सुगंधी हवा वाहत असते. आधीच्या, शिशिर ऋतूतील गोड व स्निग्ध आहारामुळे श्लेष्माचा शरीरात संचय होऊन या ऋतूत सूर्याच्या तापामुळे तो पातळ होतो व जठराग्नी कमी(मंद) करतो. अतः कफशामक औषधे घेऊन त्याचे शमन करावे. वसंत ऋतूत भ्रमण हितकारक आहे. वमन,व्यायाम,कडूतिखट रसांचे सेवन चांगले. गोड, आंबट व पचावयास जड पदार्थ, थंड पदार्थ, दही इ. टाळावे.

ग्रीष्म (उन्हाळा)[संपादन]

ज्येष्ठआषाढ महिने - वातावरण उष्ण होत जाते, त्यामुळे प्राणिमात्रांचे बल व आर्द्रतेचा नाश होतो. जलाशयांचे पाणीपण सुकत जाते.म्हणून शरीरातील कफ पण कमी होतो.त्याने वायु वाढतो. त्यामुळे गोड, मधुररसयुक्त,शीतल,सुपाच्य,रसयुक्त(काकडी,टरबुज)फळे,गोड थंड पेय,दही, ताक इ.चे सेवन करावे.थंड्या पाण्याने आंघोळ,दिवसा झोप हितकारक आहे. अत्याधिक मिठाचे पदार्थ, कडू पदार्थ, अति व्यायाम, उपास, उन्हात पायी चालणे, पचावयास जड जेवण हानिकारक आहे.

पावसाळा(वर्षा ऋतू)[संपादन]

श्रावण,भाद्रपद - या वेळेस पाणी दूषित असते. हवा बाष्पयुक्त(humid)असतो. त्याने जठराग्नी मंद होतो. उन्हाळ्यात शरीरात जमा वायु कोपतो.वातावरणातील थंडाव्यामुळे कफ पण वाढतो.पाण्यातील अम्लता वाढल्यामुळे पित्तप्रकोप पण होतो.त्यामुळेच या दिवसात शरीर जास्त रोगग्रस्त होते.पाणी उकळून प्यायला हवे.जास्त पावसाचे वेळी आंबट, खारटस्निग्ध पदार्थ खायला हवेत. दिवसा झोप घेणे, जास्त परिश्रमकरणे व रुक्ष पदार्थ सेवन करणे टाळावे.

शरद ऋतू[संपादन]

महिने-आश्विन,कार्तिक - हा ऋतू स्वास्थ्याच्या द्दृष्टीने उत्तम आहे. पावसाळ्यात वाढलेले पित्त सूर्यकिरणांमुळे लुप्त होते.दूध-साखर, आंवळा, गोड, तिखट व कडू रसयुक्त पदार्थ, मनुका इ. सेवन चांगले. गूळ, लसूण इ. पित्तकारक पदार्थ त्याज्य समजावे. ताक, दही, वांगे, क्रोध व दिवसा झोप त्याज्य.

हेमंत ऋतू[संपादन]

मार्गशीर्षपौष मास - या दिवसांत वातावरण थंड राहते. रात्र मोठी होते तर दिवस लहान. थंडीमुळे शरीराची रोम छिद्रे आकुंचन पावतात. याचा परिणाम म्हणून शरिरात उष्णता वाढते. या काळात, भूक लागून जेवण न मिळाल्यास हा वाढलेला अग्नी शरीरबलाचा नाश करतो. म्हणून या ऋतूत,मधुर, स्निग्ध, आंबटलवणयुक्त(खारट)पदार्थ, दूध वा दुधापासून केलेल्या पदार्थांचे सेवन करणे उचित. सकाळी लवकर भोजन, ताजे व गरम अन्न, शरीरमालिश, शरीर उष्ण ठेवणे, कठोर श्रम इ. करावे. कडू, तिखट, कोरडे अन्न, केळी, बटाटा त्याज्य आहेत.

शिशिर ऋतू[संपादन]

माघफाल्गुन महिने .या ऋतूची लक्षणे व चर्या साधारणतः हेमंत ऋतूसारखीच असते. अती थंड वातावरणामुळे कफाचे प्रमाण वाढते. गरम पाणी पिणे,चांगले तुपयुक्त जेवण,खिचडी इ.चे सेवन करावे. हेमंत ऋतूतील त्याज्य पदार्थ या ऋतूतही त्याज्यच आहेत.

चांगल्या आरोग्यासाठी ही ऋतुचर्या पाळणे हितावहच आहे. ऋतुसंधिकालात संपूर्ण कुटुंबासाठी कुटुंब काढ्याचे सेवन पथ्थ्यकारक(हितकारक) आहे.

बाह्य दुवे[संपादन]