आनंद यादव
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| आनंद यादव | |
| पूर्ण नाव | आनंद यादव |
| जन्म | नोव्हेंबर ३०, १९३५ कोल्हापूर, महाराष्ट्र |
| कार्यक्षेत्र | साहित्य |
| भाषा | मराठी |
| साहित्यप्रकार | कादंबरी |
आनंद यादव (नोव्हेंबर ३०, १९३५ - हयात) हे प्रसिद्ध मराठी लेखक आहेत. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] जीवन
कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आकाशवाणीवर त्यांनी काही काळ नोकरी केली. पुणे विद्यापीठात प्रपाठक म्हणून नियुक्ती झाल्यावर तेथेच मराठी विभाग प्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.
[संपादन] पुरस्कार
त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
[संपादन] प्रकाशित साहित्य
आनंद यादव यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे-
[संपादन] काव्यसंग्रह
- हिरवे जग १९६०
- मळ्याची माती१९७८
- मायलेकरं (दीर्घकविता)१९८१
[संपादन] कथासंग्रह
- खळाळ १९६७
- घरजावई १९७४
- माळावरची मैना १९७६
- अदिताल १९८०
- डवरणी १९८२
- उखडलेली झाडे १९८६
[संपादन] व्यक्तिचित्रे
- मातीखालची माती (१९६५)
[संपादन] ललितलेख संग्रह
- स्पर्शकमळे (१९७८)
- पाणभवरे (१९८२)