अल्तमस कबीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्तमस कबीर

अल्तमस कबीर (जुलै १९, इ.स. १९४८ - हयात) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ३९ वे सरन्यायाधीश आहेत. त्यांना २९ सप्टेंबर इ.स. २०१२ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शपथ दिली. अल्तमस कबीर हे १८ जुलै, इ.स. २०१३पर्यंत या पदावर असतील.