अमृता प्रीतम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमृता प्रीतम
Amrita pritam.jpg


जन्म १९१९
गुजरांवाला, पंजाब, पाकिस्तान
मृत्यू ऑक्टोबर ३१, २००५
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा पंजाबी, हिंदी
साहित्यप्रकार कविता, कादंबरी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९५७)
पद्मविभूषण पुरस्कार

पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम (१९१९-२००५) भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.

अमृता प्रीतम यांचा जन्म १९१९ मध्ये गुजरांवाला, पंजाब येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये सरले , शिक्षणदेखील तिथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

[संपादन] प्रमुख साहित्य

[संपादन] बाह्य दुवे

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये